शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

६५ गावांचा पाणीपुरवठा १ एप्रिलपासून होणार बंद; खर्च भागवणे शक्य नसल्याने योजना अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:41 IST

Gondia : गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी-मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्याने त्या १ एप्रिल २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांमधून मागील १२ वर्षापासून ६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या अनुदानाच्या अभावामुळे या योजना आर्थिक अडचणीत आल्या असून, त्यांचा खर्च भागवणे शक्य नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

मजुरी, रसायनांचा खर्च, विजेची बिले आणि देखभालीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. शासनाचे अनुदान १ एप्रिल २०१९ पासून बंद झाल्याने या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळालेले नाही, त्यामुळेच योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणया निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, लवकरच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. 

संस्थाचालक, गावकऱ्यांचा एकमताने निर्णयया संदर्भात रविवारी (दि. १६) येथे सभा घेण्यात आली. या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच, संस्थेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने १ एप्रिल २०२५ पूर्वी अनुदान मंजूर केले नाही, तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे येत्या १ एप्रिलपासून या चारही योजनांद्वारे होत असलेला ६५ गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया