शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

६५ गावांचा पाणीपुरवठा १ एप्रिलपासून होणार बंद; खर्च भागवणे शक्य नसल्याने योजना अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:41 IST

Gondia : गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी-मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्याने त्या १ एप्रिल २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांमधून मागील १२ वर्षापासून ६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या अनुदानाच्या अभावामुळे या योजना आर्थिक अडचणीत आल्या असून, त्यांचा खर्च भागवणे शक्य नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

मजुरी, रसायनांचा खर्च, विजेची बिले आणि देखभालीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. शासनाचे अनुदान १ एप्रिल २०१९ पासून बंद झाल्याने या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळालेले नाही, त्यामुळेच योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणया निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, लवकरच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. 

संस्थाचालक, गावकऱ्यांचा एकमताने निर्णयया संदर्भात रविवारी (दि. १६) येथे सभा घेण्यात आली. या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच, संस्थेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने १ एप्रिल २०२५ पूर्वी अनुदान मंजूर केले नाही, तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे येत्या १ एप्रिलपासून या चारही योजनांद्वारे होत असलेला ६५ गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया