शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

६५ गावांचा पाणीपुरवठा १ एप्रिलपासून होणार बंद; खर्च भागवणे शक्य नसल्याने योजना अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:41 IST

Gondia : गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी-मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्याने त्या १ एप्रिल २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांमधून मागील १२ वर्षापासून ६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या अनुदानाच्या अभावामुळे या योजना आर्थिक अडचणीत आल्या असून, त्यांचा खर्च भागवणे शक्य नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

मजुरी, रसायनांचा खर्च, विजेची बिले आणि देखभालीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. शासनाचे अनुदान १ एप्रिल २०१९ पासून बंद झाल्याने या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळालेले नाही, त्यामुळेच योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणया निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, लवकरच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. 

संस्थाचालक, गावकऱ्यांचा एकमताने निर्णयया संदर्भात रविवारी (दि. १६) येथे सभा घेण्यात आली. या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच, संस्थेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने १ एप्रिल २०२५ पूर्वी अनुदान मंजूर केले नाही, तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे येत्या १ एप्रिलपासून या चारही योजनांद्वारे होत असलेला ६५ गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया