शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निर्जंतुकीकरण करूनच पाणीपुरवठा करावा; जीबीएसचा प्रादुर्भाव बघता जिल्हा विभाग सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:43 IST

मुरुगानंथम : साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस.) विषाणू तसेच अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, तपासणी, परिसराची स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांमधील गळती, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, स्त्रोतांचे संरक्षण व आरोग्याबाबत जनजागृती करणे हे ग्रामपंचायतस्तरावर होणे आवश्यक आहे. त्याकरिता पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत, वितरण व्यवस्था, शाळा, अंगणवाडी, घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक व रासायनिक परीक्षण क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केल्या. 

जिल्ह्यात शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांचे सर्व स्रोत शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपात गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करावे. जीबीएस व अन्य साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जीबीएस व अन्य साथ रोगांना लक्षात घेत आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता राखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. जीबीएस व अन्य साथ रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम घेण्याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. 

प्रति व्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा कराग्रामीण भागात कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती विहित गुणवत्ता पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी ठिकाणी सातत्य व गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील गावागावांत राबविण्यात येणार आहे.

संशयित आढळल्यास विभागाला माहिती द्याजीबीएसचे रुग्ण ज्या गावात संशयित किंवा निदर्शनास आल्यास तात्काळ माहिती जिल्हास्तरावर प्रा.आ. केंद्र मार्फत कळविण्यात यावी व त्वरित उपाययोजना करण्यात यावी. त्या गावातील सर्व स्त्रोतांचे पाणी शुद्धीकरण करुन तात्काळ पिण्याच्या पाण्याचे सर्व नमुने गोळा करुन प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे.

"जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पंचायत, आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा विभागाच्या समन्वयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे अभियान स्वरुपात करुन जीबीएस विषाणू व इतर कोणत्याही साथ रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या कामात कुचराई केल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल."- एम. मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater transportजलवाहतूक