शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाणीटंचाई प्रश्नी जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:22 IST

उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अ‍ॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली.

ठळक मुद्देपाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी : उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अ‍ॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.भूजल सर्वेक्षण विभागाने पाणी टंचाईचा संभाव्य आराखडा जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर केल्यानंतर तो आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करुन उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र जि.प.ग्रामीण पुरवठा विभागाने यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या नावावर दोन महिने वेळमारून नेली. त्यामुळे जिल्ह्यातील ३९८ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. तर सहा गावातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे आला. यावर ओरड वाढल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.९) देवरी तालुक्यातील शिलापूर, बोरगाव, आमगाव तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रात येत असलेल्या वागडोंगरी, बाघाटोला व रामाटोला या गावांना भेट देऊन बोअरवेल आणि विहिरीची पाहणी करुन उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नवीन बोअरवेल व जुन्या बोअरवेलासाठी पाईप पुरवठा करण्यास सांगितले.२०१९ च्या पाणी टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्यात ज्या २५ गाव-वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरी, खामकुरा, झाशीनगर, पिपरखारी इंदिरानगर, आमगाव, मांगोटोला, महाका उचेपूर, जेठभावडा, बोरगाव शिलापूर, टेकरी, बुराडीटोला, डोंगरगाव, जवरी, शिवनटोला, शिवनी, खुर्सीपारटोला, खुर्शीपार, ठाणा, आसोली, जांभुरटोला, तिगाव, बघेडा, वडद, सोनेखारी, पाऊडदौना या गावांचा समावेश आहे.यापैकी काहीं गावांना जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करुन वस्तू स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, वरिष्ठ भुजलवैज्ञानिक नंदकिशोर बोरकर, उपविभागीय अधिकारी राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, रामाटोल्याच्या सरपंच संगिता ब्राम्हणकर, पाऊळदौन्याचे सरपंच खेमराज उईके, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी