शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

गोंदिया जिल्ह्यात प्रशासन फाईलमध्ये आणि महिला लाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:22 AM

जिल्ह्यातील १४६ गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण होवू शकते, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने जि.प.पाणी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाला देवूनही यावर उपाय योजना करण्यात आल्या नाही.

ठळक मुद्देउपाय योजना कागदावरच४ कोटी ७० लाखाची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील १४६ गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण होवू शकते, असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने जि.प.पाणी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाला देवूनही यावर उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर भल्या पहाटेपासून महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होत असल्याचे चित्र आहे. बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहे.एकंदरीत प्रशासन फाईलमध्ये आणि महिला लाईनमध्ये असेच चित्र जिल्ह्यात आहे.उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दरवर्षी पाणी टंचाईचा आराखडा तयार करुन उपाय योजना करण्यासाठी निधीची तरतूद केली जाते. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील एकूण ३९६ गावे आणि वाड्यांपैकी १४६ गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण होवू शकते.असा अहवाल जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर केला होता. पहिला ते चौथ्या टप्प्यापर्यंतच्या पाणी टंचाईचा आराखडा तयार केला.मात्र जि.प.प्रशासनाने आराखड्यानंतर उपाय योजना राबविण्याऐवजी त्या फाईलमध्येच ठेवल्या परिणामी सडक अर्जुनी, तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. गावातील बोअरवेल, विहिरीनी तळ गाठला असून काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलला पाणी येत असल्याने त्यावर सुध्दा पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच ही स्थिती असल्याने व पावसाळा सुरू होण्यास पुन्हा दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यात यंदा पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचे गांर्भिय ओळखून प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करण्याची गरज होती. पण, उन्हाळ्याला सुरूवात होवूनही आठही तालुक्यातील बोअरवेल दुरूस्ती, विहिरीतील गाळाचा उपसा आणि बोअरवेल दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले पाईपसह इतर साहित्य अद्यापही पंचायत समित्यांनी खरेदी केले नाही.त्यावरुन पाणी टंचाईच्या मुद्दावर प्रशासन कितपत गंभीर आहे हे दिसून येते.

४ कोटी ७० लाखांची तरतूदयंदा जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ४ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. यातून १८६ नवीन बोअरवेल, साहित्य खरेदीसह इतर कामे करण्यात येणार होती. मात्र अद्यापही पाणी टंचाई निवारणार्थ कामांना सुरूवात झाली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

जि.प.सदस्यांना ठेवले अंधारातजिल्ह्यातील पाणी टंचाईचा आराखडा आणि त्यावर कुठल्या उपाय योजना करण्यात आल्या याची माहिती सुध्दा जि.प.पाणी पुरवठा व यांत्रिकी विभागाने जि.प.सदस्यांसमोर सभागृहात सादर केली नाहीे. यामुळे सदस्यांनी सुध्दा स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.तरतूद आहे तर खर्च का नाहीजिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी ४ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद यावर्षी करण्यात आली.तसेच हा निधी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला. तर कोणती कामे करायची याचा आराखडा तयार असताना ही कामे करण्यासाठी खर्च का करण्यात आला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई