चार दिवसांपासून पाणी बंद

By Admin | Updated: December 22, 2016 01:04 IST2016-12-22T01:04:57+5:302016-12-22T01:04:57+5:30

शहरालगत कुंभारटोली मार्गावर ख ोदकाम केल्याने जलवाहिनीची मोडतोड करण्यात आली.

Water closure for four days | चार दिवसांपासून पाणी बंद

चार दिवसांपासून पाणी बंद

नागरिकांचा हल्लाबोल : रस्ते खोदकामात जलवाहिनीची मोडतोड
आमगाव : शहरालगत कुंभारटोली मार्गावर ख ोदकाम केल्याने जलवाहिनीची मोडतोड करण्यात आली. यामुळे आमगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी योजना मागील चार दिवसांपासून बंद पडली आहे. याविरुद्ध नागरिकांनी केलेल्या हल्लाबोल नंतर जलवाहिणी दुरुस्तीचे कार्य प्रशासनाने सुरू केले आहे.
आमगाव शहरातील नागरिकांना सुलभतेने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील विविध भागातून जलवाहिण्या घालण्यात आल्या. परंतु या जलवाहिण्यांची दुरुस्ती व देखभाल ग्रामपंचायत विभागाकडे असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वारंवार रस्ते बांधकाम व खोदकामात या जलवाहिण्यांची मोडतोड करण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.
आमगाव कुंभारटोली मार्गावर मागील पाच दिवसांपासून रस्ते मार्गावर खोदकाम कंत्राटदाराने सुरू केले आहे. त्यामुळे या खोदकामात मोठ्या प्रमाणात जलवाहिण्यांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपूर्तता मागील चार दिवसांपासून बंद पडली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परंतु खोदकाम करणारे कंत्राटदार व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे.
पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची होणारी पाण्याची कोंडी दूर करण्याऐवजी रस्ते खोदकाम विभाग, कंत्राटदार व ग्रामपंचायत प्रशासनाने हात वर करण्याचे प्रयत्न केले. याविरुद्ध यशवंत मानकर यांच्या पुढाकाराने बांधकाम ठिय्यावर हल्लाबोल करणयात आले. यावेळी राकेश शेंडे, क्रिष्णा चुटे, रघुनाथ भुते, मुन्ना गवळी, संजू खोटेले, बबलू येटरे, आनंद गळपांडे, अल्ताफ कुरैशी, पप्पु लिल्हारे, श्यामराव पराते, बंटी मामा, हरिष खरखाटे, गणेश महारवाडे, उत्तम नंदेश्वर यांनी खोदकाम करणारे कंत्राटदार, जीवन प्राधिकरण अभियंता व ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरुन पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. यानंतर कंत्राटदार व ग्रामपंचायत प्रशासनाने जलवाहिणी दुरुस्तीचे काम लगेच सुरू केले. (शहर प्रतिनिधी)

कंत्राटी अभियंता व प्रशासनाची दिरंगाई
आमगाव सह बनगाव पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिणी रस्ते खोदकामात मोडतोड करण्यात आली. यात लक्ष्मी इंजिनियरिंग, कंस्ट्रक्सन कंपनीचे कंत्राटी अभियंता उत्तम शिंदे, आमगाव ग्रामपंचायतचे प्रशासनाची दिरंगाई जलवाहिणी तोडण्यात आली. रस्ते खोदकाम सुरू असतानी उत्तम शिंदे सदर स्थळावर मुकदर्शक भूमिका घेतली. त्यामुळे जलवाहिणी तोडण्यात उशिर लागले नाही.

 

Web Title: Water closure for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.