गोंगले येथील कालादेव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 5, 2014 23:39 IST2014-07-05T23:39:53+5:302014-07-05T23:39:53+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील कालादेव मंदिर हे कुणबी समाजाचे कुलदैवत म्हणून मानल्या जात आहे. गोंगले येथील कालादेव मंदिर हे शेकडो वर्षापासून प्रसिध्द जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कालादेव बाबा,

गोंगले येथील कालादेव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत
राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनी
सडक/अर्जुनी तालुक्यातील कालादेव मंदिर हे कुणबी समाजाचे कुलदैवत म्हणून मानल्या जात आहे. गोंगले येथील कालादेव मंदिर हे शेकडो वर्षापासून प्रसिध्द जागृत देवस्थान आहे. या मंदिरात कालादेव बाबा, सिंगऱ्या-बिंगऱ्या देव, सती देव आदी देवी-देवतांच्या मूर्त्या या काला देव मंदिरात पाहावयास मिळतात. परंतु हे देवस्थान विकासपासून कोसो दूर आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, चिरचाडी, परसोडी, खजरी, कोकणा, मनेरी, कनेरी, सौंदड, डोंगरगाव/खजरी, पुतळी, शेंडा, रेंगेपार, नवाटोला, पांढरी, मालीजुंगा, खाडीपार, डव्वा, घोटी, हेटी, जांभळी, पळसगाव, कोसमतोंडी, घटेगाव, केसलवाडा, पांढरवाणी, बाम्हणी, खडकी, राका, चिंगी, खोबा आदी गावातील कुणबी समाजातील धार्मिक लोक या कालादेव मंदिर परिसरात नेहमीच येतात. नवस फेडण्यासाठी दूरवरून भाविक भक्त मोठ्या श्रध्देने या कालादेव मंदिरात येतात. काला देव मंदिर जागृत देवस्थान असल्याची आख्यायिका असल्याचे मत वयोवृध्द व्यक्ती आजही बोलून दाखवितात.
कालादेव मंदिरात दिवाळीनंतर चैत्र महिन्यात यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेला फार दूरवरून भाविक श्रध्देने येतात.
गोंगले परिसरातील भाविकांची यात्रेला फारच गर्दी असते. ही यात्रा गोंगले गाव परिसरात सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रेला सर्वच धर्म पंथाचे लोक सहभागी होतात. ही कालादेव यात्रा दोन दिवस होत असते. कालादेव मंदिर हा फार पुरातन आहे. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्याने मंदिराला सभा मंडप, सुरक्षा भिंत व विजेची सुविधा नसल्यामुळे देव उघड्यावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कालादेव मंदिराला लागून एक लहान नदी नेहमी वाहताना दिसते. पण त्या नदीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे भाविक भक्तांना फारच त्रास होतो त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. या मंदिरात पूर्ण सुखसोयीची झाल्यास भाविक भक्त नेहमीच येताना दिसतील असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले. गोंगले हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे लोकप्रतिनिधीनी या मंदिराकडे लक्ष दिले नाही. लाखो लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुरातन मंदिराकडे पाठ फिरविण्यात आली. नैसर्गिकदृष्ट्या नटलेल्या या परिसराचा विकास झाला नाही.