१७ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षा

By Admin | Updated: February 2, 2015 23:07 IST2015-02-02T23:07:24+5:302015-02-02T23:07:24+5:30

सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील

Waiting for bus station even after 17 years | १७ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षा

१७ वर्षांनंतरही बसस्थानकाची प्रतीक्षा

सडक-अर्जुनी : सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील बस स्थानकाची समस्या मार्गी लागेल अशी सर्वांना आशा आहे.
सडक येथे तीन ठिकाणी बस थांबे दिले आहेत. त्यात प्रेम शंकर भिवगडे, दुर्गा चौक व लोकेश बारसागडे यांचे सॉ मिल जवळ बस थांबे दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यात आठ ही तालुक्यात स्वतंत्र बस स्थानक तयार केले आहेत. गेल्या ८ दिवसापूर्वी अर्जुनी मोरगाव येथे नवीन भव्य बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले.
सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे येतात. लोकसंख्या १ लाख सात हजार ४९३ आहे. या लोकांचे आवगमन होत असते. पण साधे बस थांब्यावर उभे राहण्यासाठी निवारा नाही, ही सडक अर्जुनीची शोकांतिका आहे. सडक अर्जुनीच्या मुख्य बस थांब्यावर तालुक्यातील महिला, पुरुष, मुले-मुली प्रवास करतात. पण मुतारीघर नसल्यामुळे महिला व पुरूष प्रवासांना सापडेल त्या जागी मूत्र विसर्जन करून पुढे जावे लागते. महिला मंडळीची फारच कुचंबणा होताना दिसत आहे.
गोंदिया बस आगार प्रमुख गौतम शेंडे यांनी लक्ष देवून मुतारी घरांची सुविधा केली पाहिजे. जुना बस थांबा आहे. पडके शेडही आहेस पण सफाई कामगार नसल्यामुळे नेहमीच अस्वच्छता दिसत आहे. बस थांब्याचे शेडमध्ये विद्यार्थी पास कार्यालयाचे स्थापना एक वर्षापासून करण्यात आली. ह्या पास कार्यालयामुळे तालुक्यातील शाळेचे मुला मुलींना व पास घेवून भ्रमण करणाऱ्या नागरिकांना सडक अर्जुनी येथूनच पास देण्याची सुविधा फारच लाभदायक आहे. कार्यालय म्हटले तर त्या कार्यालयात विज पाणी व मुतारी घराची नितांत गरज राहते. पण वेळकाढू अधिकाऱ्यांचे दुर्लक्षते पणामुळे ही समस्या नेहमीच भडेसावत आहे.
तालुक्याचे मुख्य बस थांबा आहे. त्याचे बाजूला कार्यालय ही आहे. त्यासाठी जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बस आगार विभागाकडून वाटर फिल्टर लावण्याचे सौजन्य दाखविले पाहिजे.
विजेची सोय नसल्यामुळे ह्या बस थांब्याजवळ रात्रीचे वेळी अंधाराचे साम्राज्य पसरला असते. विज नसल्यामुळे त्या विद्यार्थी पास कार्यालयात दिवसा अंधार राहत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सडक अर्जुनीच्या तालुक्याचा बस स्थानकाची समस्या जिल्ह्याचे अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनी लक्ष देवून भव्य बस स्थानकाची कल्पना मनात आणावी असे वाटते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for bus station even after 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.