शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
3
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
4
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
5
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
6
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
7
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
8
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
9
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
10
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
11
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
12
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
13
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
14
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
15
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
16
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
17
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
18
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
19
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
20
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला

अबब! एका पुलासाठी गावकऱ्यांचा 17 वर्षांपासून लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 12:29 PM

गावकरी आणि संघटनेचा पुलासाठी संघर्ष कायम आहे.

गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावा. यासाठी मागील 17 वर्षापासून येथील गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र आजवर लोकप्रतिनिधी आणि शासनाने केवळ येथील गावक-यांना पूल तयार करण्याचे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली. त्यामुळे अद्यापही पुलाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने गावकऱ्यांची समस्या कायम असून 'ये पूल कब बनेगा असा सवाल करित आहे.

डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आल्यास महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात ये-जा करण्याचा मार्ग सुकर होईल. डांगोर्ली हे गाव मध्यप्रदेशच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात आल्यास दोन्ही राज्यातील लोकांना व्यापार आणि इतर दृष्टीने सुध्दा ते सोयीचे होईल.

डांगोर्ली येथील अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पावसाळ्या सुध्दा धोका पत्थकारुन या नदीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कधी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाअभावी गावकऱ्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. याचीच दखल घेत गोंदिया जिल्हा दलित सेनेचे अध्यक्ष ओमकार बन्सोड यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रश्न केला. 10 डिसेंबर 2003 मध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढून व उपोषण केले होते. तेव्हा तत्कालीन सरकारने मध्यप्रदेश सरकारसोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

मात्र 17 वर्षांचा कालावधी लोटूनही हा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. त्यामुळे गावकरी आणि संघटनेचा पुलासाठी संघर्ष कायम आहे. डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीवर पूल तयार झाल्यास या दोन्ही राज्यांमध्ये उद्योग धंद्यात वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शिवाय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होत असलेला त्रास दूर होईल. त्यामुळे शासनाने याचा गांर्भियाने विचार करुन आतातरी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वैनगंगा पूल निर्माण समितीचे अध्यक्ष ओमकार बन्सोड व गावकऱ्यांनी केली आहे.