शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

निंबा गाव बनले काष्ठकलेचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:37 IST

टाकाऊ ते टिकाऊ या संकल्पनेला अनुसरुन निरुपयोगी सागवानच्या लाकडापासून काष्ठशिल्प कलेचा नमूना तालुक्यातील निंबा या गावात घरोघरी पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देगावकºयांनी थाटला स्वयंरोजगार : टाकाऊ ते टिकाऊ बनले उदरनिर्वाहाचे आधार

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : टाकाऊ ते टिकाऊ या संकल्पनेला अनुसरुन निरुपयोगी सागवानच्या लाकडापासून काष्ठशिल्प कलेचा नमूना तालुक्यातील निंबा या गावात घरोघरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे निंबा हे गाव काष्ठशिल्प कलेचे माहेरघर बनले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गावातील अनेक कुटुंबांनी काष्ठशिल्प कलेला उदरनिर्वाहचा आधार बनवून जीवनयापन करताना दिसून येत आहे.तालुका मुख्यालयापासून ३ किमी. अंतरावर असलेले निंबा हे गाव सालेकसा ते पिपरीया बस मार्गावर असून भाताची शेती करणे या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्या बरोबर या गावाला लागूनच पूर्वी भागात मोठे घनदाट जंगल सुद्धा पसरले आहे. या गावात शेतमजूर आणि वनमजूरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील जास्तीतजास्त लोकांना आपले जीवन चालविण्यासाठी रोजगार व कामाची नेहमी गरज पडते. दगा देणारी शेती व उद्योगांचा अभाव यामुळे पोटापाण्याचा प्रश्न नेहमी या परिसरात उद्भवत असतो. अशात अनेक कुटुंब शहराकडे सुद्धा पलायन करीत असतात. परंतु काही लोकांनी आपल्या कलागुणांना ओळखून गावातच राहून त्या कला गुणांचा उपयोग करीत जगण्याची वाट शोधण्याचे काम उत्स्फूर्तपणे केले आहे. काष्ठ केलेच्या कौशल्याचा उपयोग करीत त्यातच आपले जीवनयापन करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला आहे.निंबा या गावालगत मोठे जंगल व्यापलेले आहे. या जंगलात विविध बहुपयोगी झाडे असून त्यात सागवानच्या किमती व दर्जेदार लाकडाची झाडे येथील वनात मोठ्या प्रमाणात असून सागवानाच्या लाकडाची तसेच सागवानच्या लाकडापासून तयार फर्निचर व इतर साहित्याची सर्वात जास्त मागणी होत असते. येथील जंगलातील सागवानच्या झाडाची कटाई काही प्रमाणात अधिकाधिक स्तरावर होते. परंतु मोठ्या प्रमाणावर या झाडाची कत्तल करुन लाकूड चोरीचे गैरकाम सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. सागवानच्या झाडांची कत्तल करुन सरळ व उपयोगी भाग घेवून जातात. त्या झाडांच्या फांद्या व बुड तसेच पडून राहते व त्याला निरुपयोगी समजून सोडून दिले जाते.काष्ठशिल्पसाठी सागवानच्या झाडाचे बुड सर्वोत्तम उपयोगी असून बुडातील जड्याची लाकडे काष्ठशिल्प व कोरीव कामे करण्यासाठी सर्वात उत्तम असून त्यावर दर्जेदार कलात्मक व शाळेच्या वस्तू तयार केल्या जातात. तसेच फांद्या सुद्धा कलात्मक वस्तू तयार करण्यासाठी उपयोगी पडतात. गावातील काष्ठ शिल्पकार जंगलातील निरुपयोगी ही लाकडे संकलित करुन घरी आणतात. त्यावर आपल्या कला गुणांचा उपयोग व कोरीवकाम करुन किंवा नक्षीकाम करुन शोभेची वस्तू तयार करतात. यात धनाढ्यांच्या ड्रार्इंग रुमला रुजविणाºया आकर्षक शोभेच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. शोकेसमध्ये ठेवून ड्रॉर्इंग रूमची शोभा वाढविणारे विविध प्राणी, पक्षी, फूल, पाखळ्या, वृक्ष इत्यादींची प्रतिकृती काष्ठ कलेतून तयार करतात.त्याचबरोबर टी टेबलचे स्टँड, टेबललॅम्प, पानदान सारख्या उपयोगी वस्तू सुद्धा काड्यांवर नक्षीकाम करुन केले जाते. याशिवाय असंख्य प्रमाणात उपयोगी व शोभेच्या वस्तु काष्ठकलेतून तयार केल्या जातात. अनेकांच्या कलात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेरुन आलेले अधिकारी-कर्मचारी, एस.आर.पी. किंवा सी.आर.पी.एफ.चे जवान, उच्च विलासी जीवन जगणारे लोक या वस्तुंना आवडीने खरेदी करतात.मात्र परिश्रमाच्या तुलनेत हवी तेवढी रक्कम या काष्ठ कलाकारांना मिळत नाही, किंवा आवश्यक व आधुनिक औजार त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांच्या वस्तू निर्मितीचा वेग कमी असल्याने आर्थिक लाभाचे प्रमाण कमी आहे.शासनाच्या पाठबळाची गरजकेंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक योजना ग्रामीण भागातील लोक व काष्ठ कारागिरांसाठी चालत आहेत. परंतु दुर्भाग्य असे की, या योजनांचा लाभ निंबा येथील कारागिरांना मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. उलट काही हुशार दलाल या कारागिरांकडून तयार केलेल्या वस्तू कमी भावाने खरेदी करुन त्यावर आपल्या नावाचे श्रेय लाटत दुप्पट ते तीप्पट पैसे कमविण्याचे काम करीत आहेत. निंबा गावात जवळपास २५ ते ३० पुरुष आणि महिला कारागिर काष्ठशिल्प कलेचे काम करीत असून त्यांना शासनाचे पाठबळ मिळाले तर आधुनिक औजार, साहित्य, लाकूड कापण्यासाठी मशीन, मोटार, लाकडावर चमक आणण्यासाठी मशीन तसेच उपयुक्त वातावरण निर्माण करुन देणारे कक्ष व आधुनिक सोयी सुविधा मिळविता येतील. शासनाने कर्जाची किंवा अनुदानाची व्यवस्था करुन दिल्यास निंबा गावात काष्ठशिल्प कलेच्या निर्मितीचे मोठे केंद्र उभारुन अनेकांना रोजगाराची संधी मिळू शकते. तसेच येथील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.