शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली.

ठळक मुद्देशेतमजुरांची मजुरी वाढली : परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, अन् शेतकऱ्यांचे खरीप पीक पाण्यात वाहून गेले. हजारोंचा पेरणी, निगराणीचा खर्चही निघत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागाईमुळे शेतकºयांना मोठे कष्ट करावे लागत आहे. मात्र हे दुख: विसरुन बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली. परतीच्या पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक सडून गेले. परतीच्या पावसाने धान मातीमोल झाल्याने पेरणीसाठी झालेला खर्च कसा निघणार याची चिंता शेतकºयांना लागली आहे.धानाचे बहरलेले शेत पावसानंतर उत्पादनहीन झाल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी हतबल होऊन उरले सुरले धान शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.उत्पादन वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली.यात ही महागाईने तोंड वर काढले. याशिवाय शेती कामातील रोजगारांचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामाकरिता पुरुषांसाठी ३०० तर महिला रोजगाराकरिता १५० रुपये इतका खर्च लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडत असल्याची वास्तविकता निर्माण झाली. पुढील पिके घेण्याची तयारी करण्यासाठी शेतकºयास आता पेरणीच्या दुप्पट खर्च लागत असल्याने नवीन पेरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.तणनाशकांच्या किमतीत वाढपावसामुळे शेतात विविध प्रकारचे तण (गवत) वाढले. त्यामुळे शेती मशागत करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने तणनाशक औषधाद्वारे नष्ट करण्यावर शेतकºयांनी भर दिला. परंतु जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन भाववाढ केली. २८० रुपयांना मिळणारा तणनाशकाचा डबा आता ३५० रुपयांपेक्षा अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती