शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली.

ठळक मुद्देशेतमजुरांची मजुरी वाढली : परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, अन् शेतकऱ्यांचे खरीप पीक पाण्यात वाहून गेले. हजारोंचा पेरणी, निगराणीचा खर्चही निघत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागाईमुळे शेतकºयांना मोठे कष्ट करावे लागत आहे. मात्र हे दुख: विसरुन बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली. परतीच्या पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक सडून गेले. परतीच्या पावसाने धान मातीमोल झाल्याने पेरणीसाठी झालेला खर्च कसा निघणार याची चिंता शेतकºयांना लागली आहे.धानाचे बहरलेले शेत पावसानंतर उत्पादनहीन झाल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी हतबल होऊन उरले सुरले धान शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.उत्पादन वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली.यात ही महागाईने तोंड वर काढले. याशिवाय शेती कामातील रोजगारांचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामाकरिता पुरुषांसाठी ३०० तर महिला रोजगाराकरिता १५० रुपये इतका खर्च लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडत असल्याची वास्तविकता निर्माण झाली. पुढील पिके घेण्याची तयारी करण्यासाठी शेतकºयास आता पेरणीच्या दुप्पट खर्च लागत असल्याने नवीन पेरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.तणनाशकांच्या किमतीत वाढपावसामुळे शेतात विविध प्रकारचे तण (गवत) वाढले. त्यामुळे शेती मशागत करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने तणनाशक औषधाद्वारे नष्ट करण्यावर शेतकºयांनी भर दिला. परंतु जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन भाववाढ केली. २८० रुपयांना मिळणारा तणनाशकाचा डबा आता ३५० रुपयांपेक्षा अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती