शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

इटखेडा येथील सरपंचाविरूद्धचा निर्णय वैध

By admin | Updated: May 7, 2014 18:44 IST

इटखेडा येथील सरपंच जनार्धन मेश्राम यांचेवर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. याविरूध्द त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे विवाद अर्ज दाखल केला.

 अर्जुनी/मोरगाव : इटखेडा येथील सरपंच जनार्धन मेश्राम यांचेवर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. याविरूध्द त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे विवाद अर्ज दाखल केला. हा अर्ज फेटाळण्यात आला असून इटखेडा येथील सरपंचाविरूध्द पारित अविश्वास ठराव व घोषीत निर्णय वैध ठरविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार इटखेडा/इसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २१ आॅक्टो. २०१२ रोजी झाली. या ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य आहेत.

सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदावर जनार्धन मेश्राम हे निवडून आले. ते गावाबाहेर असतांना २४ फेब्रु. रोजी त्यांचे गैरहजेरीत इतर ८ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. तत्पूर्वी १७ फेब्रु.रोजी सरपंच विरूध्द अविश्वास प्रस्तावाची नोटीस इतर सदस्यांनी तहसीलदारांना दिली होती. तहसीलदार संतोष महाले यांनी १८ फेब्रु. रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावली. सरपंच मेश्राम यांचे घराला कुलूप लावले असल्याने त्यांचे घरात दर्शनी भागात नोटीस चिपकवून तीन साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्याने अप्पर जिल्हाधिकार एन.के. लोणकर यांनी ही कार्यवाही नियमानुसार योग्य असल्याचे ठरविले.

अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर सरपंच मेश्राम यांनी १ ते ५ मुद्यावर अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ (३-ब) अंतर्गत सरपंच मेश्राम यांनी दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळून लावला. अर्जदार सरपंच मेश्राम यांनी तहसीलदार, उपसरपंच वासुदेव उईके व इतर ७ सदस्य तसेच ग्रामसचिव यांचेविरूध्द अर्ज दाखल केला.