शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
3
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
4
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
5
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
6
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
7
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
8
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
9
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
10
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
11
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
12
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
13
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
14
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
15
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
16
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
17
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
18
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
19
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
20
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

आता प्रवास व खरेदीसाठीही लसीकरण बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 5:00 AM

प्रवासादरम्यान कोरोना बाधितापासून सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर एकतर व्यक्तीला गंभीर संसर्ग होत नसून दवाखान्यात भर्ती होण्याची गरज पडत नाही. शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच आता शासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीलाच बसमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेल्या कहरानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन पूर्वपदावर येत होते. अशातच आता ओमायक्रॉन देशात धडकला असून त्याची धास्ती अवघ्या देशातच पसरली आहे. असे असतानाच कोरोनाला मात देण्यासाठी फक्त आणी फक्त लसीकरण हेच महत्त्वाचे शस्त्र असल्याने शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. लस घेणाऱ्यांकडून पुढील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नसते. यामुळेच शासनाकडून लसीचे दोन्ही डोस घेणे आता बंधनकारक केले जात आहे. शिवाय ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठीही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून निर्बंध लावले जात असतानाच जिल्हा प्रशासनाकडूनही काही निर्बंध लावून कोरोनाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच आता प्रवासासह खरेदीसाठीही लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. 

 लसीकरण असेल तरच बसचा प्रवास - प्रवासादरम्यान कोरोना बाधितापासून सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर एकतर व्यक्तीला गंभीर संसर्ग होत नसून दवाखान्यात भर्ती होण्याची गरज पडत नाही. शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. यामुळेच आता शासनाने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीलाच बसमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे. यासाठी प्रवास करताना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नागरिकांना बाळगणे गरजेचे झाले आहे. 

रेल्वे स्थानकांवरही परवानगी नाही - प्रवासाचे प्रमुख माध्यम रेल्वे असून नागरिकांची सोय म्हणून शासनाने गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र यानंतरही शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. याकरिता रेल्वे स्थानकांवरही नागरिकांची कोरोना लसीकरणाबाबत चौकशी केली जात आहे. प्रवासादरम्यान एखाद्या बाधिताच्या संपर्कात येऊन कित्येकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसून हा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

...तर बाजारात साहित्यही मिळणार नाहीप्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका असतानाच मॉलमध्येही नागरिकांच्या संपर्कात येऊन हा धोका टाळता येत नाही. हेच कारण आहे की, शासनाने मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्याचे निर्बंध लावले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मॉलमध्ये प्रवेश दिला जात आहे. म्हणजेच, खरेदीसाठीही आता लसीकरण गरजेचे झाले आहे. 

रोज २०० तपासण्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून सध्या ८ ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यात दररोज २००-२५० तपासण्या केल्या जात आहेत. मात्र आता ओमायक्रॉनचा कहर बघता यामध्ये वाढ करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. 

१२२ केंद्रांवरून लसीकरण जिल्ह्यात सध्या १२२ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला हीच संख्या २०० केंद्रांपर्यंत गेली होती. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने आता केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या