शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

जिल्ह्यात लसीकरणाने गाठला ४१ टक्क्यांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:20 AM

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ...

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ४१ टक्क्यांचा टप्पा गाठला असून, रविवारपर्यंत (दि. १८) ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने खंड पडत असलेल्या लसीकरणाला पुन्हा गती आल्याचे दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर नागरिकांचे लसीकरण किती गरजेचे आहे हे दिसून आले. यामुळे शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लसीकरणावर जोर दिला जात असून, यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यापासून लसीकरण शिबिर व मोबाईल युनिटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरण केले जात आहे. याचे फलितही येत असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ४०.९७ एवढी टक्केवारी आहे.

विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा तुटवडा होत असल्यामुळे कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता. अन्यथा जिल्हा ४१ टक्क्यांऐवजी ५० टक्के पार करून पुढे निघून गेला असता. मात्र, लसींचा साठाच नसल्याने लसीकरणात विघ्न आले व आकडेवारी घटली. मात्र, आता लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने लसीकरण पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यात आले असून, त्याची गती वाढल्याचे दिसत आहे. यामुळे नक्कीच याचा फायदा मिळणार आहे, यात शंका नाही.

--------------------------------

१.४३ लाख तरुणांचे लसीकरण

जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, तेव्हापासून या गटातील तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,४३,२२९ तरुणांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांची २२.९२ एवढी टक्केवारी आहे. यात १,३३,४१५ तरुणांनी (२१.३५ टक्के) पहिला डोस घेतला असून, ९ ८१४ तरुणांनी (१.५४ टक्के) दुसरा डोस घेतला आहे.

------------------------------

फक्त ८ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

जिल्ह्यात जेथे आतापर्यंत ५,३२,४१३ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे तेथे फक्त ८.२३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४,२५,४९१ असून, त्याची टक्केवारी ३२.७४ एवढी आहे. फक्त १,०६,९२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची ८.२३ एवढी टक्केवारी आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरिकांनी वेळ येताच न चुकता लस घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.