३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST2021-06-13T05:00:00+5:302021-06-13T05:00:02+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेग घेत असून नागरिकांनी आता स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. 

Vaccination of 3.5 lakh citizens | ३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

ठळक मुद्देलसीकरण मोहीम जोमात : आता नागरिकांनी पुढे येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासन लसीकरणावर जोर देत असून यासाठी नवनवे उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातही लसीकरणासाठी मोहीम राबविली जात असून केंद्रांची संख्या वाढवून शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. याचे फलित आहे की, शुक्रवारपर्यंत (दि.११) जिल्ह्यातील ३,०५,२५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशांनी आता स्वत: पुढे येण्याची गरज आहे. 
मागील वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी कुणाकडेही काहीच औषध नव्हते. परिणामी, कोरोनाने मागील वर्षी चांगलीच जीवितहानी केली होती. मात्र, यावर्षी कोरोनाशी लढण्यासाठी देशात २ लसी तयार करण्यात आल्या असून त्यांचे लसीकरण सुरू आहे. 
मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल व मे महिन्यांत कहर करून कित्येकांचे जीव घेतले. यात मात्र लसीची सुरक्षितता व तिचे परिणाम जाणून घेता आले. म्हणूनच, शास्त्रज्ञांनी कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासन लसीकरणावर जोर देत आहे. 
जिल्ह्यातही १०० टक्के लसीकरण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणाची मोहीम राबविली जात असून यासाठी शहरासह ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढविली जात आहे. 
शिवाय, जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे, जेणेकरून जास्तीतजास्त व लवकरात लवकर जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण व्हावे. यामुळेच लसीकरणाला आता जोर येत असून शुक्रवारपर्यंत (दि. ११) जिल्ह्यात ३,०५,२५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
 

२,३२,६१३ नागरिकांनी घेतला पहिला डोस
- जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेग घेत असून नागरिकांनी आता स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. 
१८-४४ वयोगटात आनंद 
-येत्या २१ तारखेपासून १८-४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण केले जाणार आहे. यामुळे या गटातील तरुण व युवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मध्यंतरी, देण्यात आलेल्या परवानगीनंतर या वयोगटातील ११,५५६ जणांनी पहिला, तर २९९१ जणांनी दुसरा म्हणजेच एकूण १४,५४७ जणांनी लस घेतली आहे. आता २१ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात होत असल्याने त्यांची सोय होणार आहे.

 

Web Title: Vaccination of 3.5 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.