साखरीटोल्यातील भारनियमन बंद करा

By Admin | Updated: May 29, 2014 02:32 IST2014-05-29T02:32:57+5:302014-05-29T02:32:57+5:30

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे सुरू असलेले विजेचे भारनियमन त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

Turn off the weight loss in the literati system | साखरीटोल्यातील भारनियमन बंद करा

साखरीटोल्यातील भारनियमन बंद करा

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे सुरू असलेले विजेचे भारनियमन त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत विभागाने साखरीटोला फिडरला भारनियमनाचा तडाखा दिल्याने लोकांना उष्णतेचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विद्युत विभागाविषयी रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या संतापाचा बांध केव्हाही फुटून ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साखरीटोला येथे विद्युत पुरवठा सतत व्हावा यासाठी येथील काही सुज्ञ मंडळीनी प्रयत्न करून ३३ केव्ही पॉवरचे पॉवर हाऊस तयार करण्यात मोठा हातभार लावला होता. तीन फिडरपैकी साखरीटोला फिडरला भारनियमन देण्यात येते. त्यामुळे आग ओकणार्‍या सुर्याच्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. भरदिवसा दुपारी २.३0 वाजता ते ५.३0 वाजतापर्यंत कडक उष्णतेच्या वेळी भारनियमन असते. त्यामुळे नागरिक, व्यापारी, दुकानदार चांगलेच संतापलेले आहेत.

भारनियमामुळे व्यापारी, दुकानदार, राईस मिल मालक तसेच छोटे-छोटे व्यवसाय करणार्‍या लोकांना चांगलाच फटका बसला असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सालेकसा तालुका नक्षलग्रस्त व आदिवासी म्हणून परिचीत असतांना तालुक्यातील गावांमध्ये भारनियमन कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील बर्‍याच दिवसापासून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत विभागान साखरीटोला,कारूटोला, बापूटोला तसेच आजूबाजूच्या गावात भारनियमन सुरू असले तरी या समस्येकडे मात्र लोकप्रतिनिधीच पूर्णपणे दुर्लक्ष आहेत. विद्यमान आमदार सुध्दा ही समस्या सोडविण्यासाठी गंभीर नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे.

विद्युत विभागाच खाजगीकरण झाल्यानंतर ग्राहक नियमित बिलाचा भरणा करतात. एक किंवा दोन महिने बील न भरल्यास विद्युतचे कनेक्शन कापले जाते. मग जे लोक नियमित बिलाचा भरणा करतात. त्यांना भारनियमनाचा तडाखा का दिला जातो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्युतचे भारनियमन त्वरीत बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तंमुसचे अध्यक्ष प्रकाश दोनोडे, सरपंच संतोष शहारे, गांधीटोल्याच्या सरपंच रेखा टेकचंद फुंडे, कारूटोल्याचे सरपंच मिलिंद गजभिये, अरविंद गजभिये, संजय कुसराम, पृथ्वीराज शिवणकर यांनी विद्युत विभागाकडे केली आहे. भारनियमन बंद न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी दाखविली आहे. नक्षलग्रस्त भागात भारनियमन होणार नाही असे शासन सांगत असले तरी सर्रासपणे भारनियमन होत आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Turn off the weight loss in the literati system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.