शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
3
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
10
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
11
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
12
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
13
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
14
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
15
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
16
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
18
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:57 AM

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला.

ठळक मुद्देसां.बा.विभाग लागला कामाला : जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दिले. यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम हा मुद्दा उघडकीस आणला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) अधिसूचना काढून मंगळवारपासून (दि.३१) उड्डाणपूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. मुंबई येथे रेल्वेचा जुना पूल कोसळल्यानंतर रेल्वे विभाग कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने तडाकफडकी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवून जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले. हे पत्र जिल्हाधिकाºयांच्या हातात पडताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेवून यावर उपाय योजना काढण्यासाठी मार्गदर्शन मागविले.त्यात शहरात येणारी सर्व जड वाहतूक बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला.आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. तसेच शहरवासीयांना त्रास सहन करावा लागले. त्यामुळे जुना उड्डाणपूल पायी जाण्यासाठी व हलक्या वाहनासाठी सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. त्यानंतर प्रशासनाने अग्रवाल यांच्या मागणीनुसार या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) सांयकाळी जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना काढली.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली बैठकजुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीत जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर तोडगा काढण्यात येणार आहे. या पुलाच्या स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल आल्यानंतर पूल पाडायचा की नाही व वाहतूक कोणत्या मार्गे वळवायची यावर या बैठकीत तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.रेल्वे विभागाकडून वाढला दबाबगोंदिया-बालाघाट मार्गावरील जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलासंदर्भात रेल्वे विभाग कुठलीही जोखीम पत्कारण्यास तयार नाही. मुंबई येथील घटनेनंतर रेल्वे प्रशासन सुद्धा कोमात आहे. अशात जुन्या उड्डाणपुलावरुन एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे.नवीन पुलाची करणार दुरूस्तीदोन वर्षापूर्वी गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. मात्र नवीन उड्डाणपुलाच्या दोन्हीे बाजुला पायी जाणाºया नागरिकांसाठी पादचारी पूल तयार करण्यात आला नाही.त्यामुळे हा पूल सदोष पूर्ण असून यात सुद्धा दुरूस्ती करण्याची गरज असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला असल्याची माहिती आहे.