शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड रेल्वेस्थानकावर प्रवासी रखरखत्या उन्हात

By admin | Updated: May 10, 2014 02:27 IST

गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावरील सौंदड रेल्वे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु येथील अपुऱ्या सोयी-सुविधामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

सौंदड : गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावरील सौंदड रेल्वे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु येथील अपुर्‍या सोयी-सुविधामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असलेल्या या स्टेशन नेहमीच मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. या स्टेशनवर प्रवाशांना तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गाडी स्टेशनवर येण्याच्या अर्धा तास अगोदर तिकीट विक्रीला सुरूवात होते. येथे तिकीट विक्रीसाठी एकच काऊंटर असल्याने प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. या अर्ध्या तासात काही प्रवाशी तिकीट मिळविण्यात यशस्वी ठरतात तर काही प्रवाशी स्टेशनवर गाडी आल्यानंतर तिकीट विक्री बंद झाल्याने तिकीटापासून वंचीत राहतात. अशातच दुसरी गाडी नसल्याने नाईलाजाने विनातिकीट प्रवास केल्याने या प्रवाशांना पकडले जाण्याची भिती प्रवासादरम्यान सतत भेडसावत असते आणि पकडली गेले तर अशा प्रवाशांना नाहक २६० रुपये दंड रुपाने द्यावे लागते. प्रवाशांवर ही नामुष्की येऊ नये यासाठी रेल्वे विभागाने येथे पूर्ण वेळ तिकीट विक्री सुरू ठेवावी अथवा एकापेक्षा जास्त तिकीट विक्रीचे काऊंटर शुरू करण्याची मागणी प्रवाशांनी ‘लोकमत’जवळ बोलून दाखविली. या रेल्वे स्टेशनवर सावलीच्या अपुर्‍या शेडमुळे पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहून रेल्वेची प्रतिक्षा करावी लागत आहे. किमान चार महिन्यांपासून सावलीच्या शेडकरीता सांगाडा उभा केला आहे. परंतु या सांगाड्यावर पत्रे लावण्यात आली नसल्याने याचाही लाभ उन्हाळ्यात प्रवाशांना घेता येत नाही. रेल्वे स्टेशन लांब असण्याने असे अनेक शेड उभारण्याची गरज आहे. जेणेकरून प्रवाशांना सावलीचा आडोसा घेता येईल. येथे ३ ते ५ वाजेपर्यंत आरक्षण करण्याचा कालावधी असून हा अपुरा कालावधी असल्याने येथे पूर्ण वेळ आरक्षण करण्याची व्यवस्था ही करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांना आरक्षणाला मुकावे लागणार नाही. (वार्ताहर)