शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

घनकचरा प्रकल्पाने होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे.

ठळक मुद्देखत, रोजगार व गॅस निर्मिती : घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेकडून जागेचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प उभा झाल्यास शहर व गावांतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या सुटणार आहे. शिवाय प्रकल्पामुळे खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण दूषित होत आहे. याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावरही होत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.सध्या केंद्र शासनाकडून स्वच्छतेवर जास्त भर दिला जात आहे. वातावरण स्वच्छ असल्यास स्वस्थ आरोग्य लाभते यामुळे शहरीच काय ग्रामीण भागातही स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यासाठीच नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याची गरज आहे.त्यासाठी त्यांचा जागेसाठी शोध सुरू आहे. नगर परिषदेचा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा झाल्यास शहरातील घनकचºयाची समस्या सुटणार असतानाच संबंधीत गावांतीलही घनकचºयाचे व्यवस्थापन होणार आहे. याचा फायदा त्या-त्या गावांनाही मिळणार आहे. याशिवाय, या प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खत व गॅस निर्मिती केली जाणार आहे.प्रकल्प असलेल्या गावकऱ्यांना प्रकल्पातून खत मिळणार. शिवाय, वाहन व घरांत स्वयंपाकासाठी गॅस मिळणार. महत्त्वाची बाब म्हणजे, या घनकचरा प्रकल्पात मनुष्यबळ लागणार असून रोजगार निर्मिती होणार आहे. काही लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.एकंदरीत हा प्रकल्प घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीच फायदेशीर नसून त्यापासून अन्य फायदे मिळणार आहेत.कारंजा ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा आजनगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघितली आहे. ही जागा नगर परिषदेला द्यायची की नाही हे ठरविण्यासाठी मंगळवारी (दि.४) विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे गावातील वातावरण गावातील नागरिकांच्या आरोग्यावर काहीच परिणाम होणार नाही. उलट गावातील कचºयाचेही व्यवस्थापन करता येणार असून गावातील वातावरण अधिक शुद्ध होणार आहे. त्यामुळे आता कारंजा ग्रामपंचायतने ठराव दिल्यास गोंदिया शहरासह कारंजा गावातील कचºयाची समस्या सुटून सोबतच त्यांना खत, गॅस व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.अत्यंत लाभदायी ठरणारा प्रकल्पघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या सुटणार असतानाच गावकऱ्याना खत, गॅस व रोजगार उपलब्ध होणार आहे. गावातील कचऱ्याची समस्या सुटून तेथील वातावरण दूषित होणार नाही.त्यामुळे प्रकल्पासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.- अशोक इंगळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गोंदियागावचाही बहुमुखी विकास होणारया प्रकल्पामुळे संबंधीत गावातील घनकचरा व्यवस्थापनाची समस्या सुटेल. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावाला चांगली कामगिरी करता येईल. शिवाय, गावातील लोकांना रोजगार मिळणार असतानाच खत व गॅसचाही लाभ घेता येईल. प्रकल्पामुळे गावातील वातावरण व लोकांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम होणार नाही.- चंदन पाटील, मुख्याधिकार, नगर परिषद, गोंदिया

टॅग्स :Socialसामाजिक