शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:17 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देग्रामीण जीवनोन्नती अभियान : सहा संघांना मिळाल्या गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, प्रकल्प संचालक डॉ. मुंडे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे, जिल्हा अभियंता व्यवस्थापक अनिल गुंजे, जिल्हा व्यवस्थापक नाशिर शेख, प्रविण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक रेशिम नेवारे, तालुका व्यवस्थापक कोविंदकुमार रंगारी, प्रभाग समन्वयक सुरेंद्र भावे, श्वेता रंगारी, अमित सिंगरौर, प्रभाग व्यवस्थापक डोंगरवार, आष्टेकर, भोवे, गोपाल मेश्राम आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात उत्पादित होणारा माल सरळ बाजारपेठेत पोहोचता करुन महिलांचा आर्थिक स्त्रोत वाढविणे व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे या उदात्त हेतूने तालुक्यातील एकता ग्राम संघ गौरनगर, भरारी ग्रामसंघ महागाव, राणी ग्रामसंघ बोरटोला, साक्षी ग्रामसंघ येगाव, एकता ग्रामसंघ धाबेटेकडी, सावित्रीबाई फुले ग्रामसंघ भिवखीडकी या सहा ग्रामसंघांना चारचाकी वाहने हस्तांतरित करण्यात आली.चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिल्यामुळे ग्रामसंघांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून उत्पादित केलेला माल भाजीपाला, गौणउपज, कडधान्य मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होईल. ग्रामसंघाच्या माध्यमातून गावात उत्पादित होणाऱ्या मालाचे संग्रहन करुन तो बाजार पेठेत वाढविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. चारचाकी गाडीच्या सहाय्याने लहान व्यवसाय सुरु करुन एका गावातील २०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी यावेळी सांगितले. संचालन अभियान व्यवस्थापक (आजीविका) प्रविण भांडारकर यानी केले. आभार रेशिम नेवारे यांनी मानले.महिला विकासासाठी शासन कटिबद्ध - बडोलेअभियानाच्या माध्यमातून महिलांचे गट तयार करणे व ग्रामसंघाची स्थापना करुन त्यांना वित्तीय सहायता (उद्योगासाठी) यासाठी योग्य समन्वयाची गरज आहे. बचतगटांचे सक्षमीकरण करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तालुक्यात ३०० महिलांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून स्थापन केलेल्या गिरीजा महिला शेतकरी उत्पादक संघाला व्यावसायाकरिता आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले