आज परिवर्तनशील साहित्य संमेलन
By Admin | Updated: February 6, 2016 01:55 IST2016-02-06T01:55:45+5:302016-02-06T01:55:45+5:30
युगपुरूष युवा मंचाच्या सौजन्याने लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडीद्वारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारी व्यासपीठाचे ...

आज परिवर्तनशील साहित्य संमेलन
साहित्यिक-कवींची हजेरी : नवोदितांचे बंड
बाराभाटी : युगपुरूष युवा मंचाच्या सौजन्याने लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडीद्वारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारी व्यासपीठाचे चौथे परिवर्तनशील साहित्य संमेलन शनिवारी (दि.६) सकाळी ९.३० वाजतापासून सुरू होत आहे.
सदर संमेलनात पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, रोगनिदान शिबिर, परिवर्तन रॅली, कवी संमेलन होणार आहे. या वैरारिक क्रांती घडविणाऱ्या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश्य म्हणजे प्रस्थापित साहित्यिकांच्या विरोधात तळागाळातील विद्रोह करणारे साहित्य समाजापुढे यावे, समाज घडावा, येणाऱ्या पिढीला चांगला संदेश मिळावा, हे आहे.
उद्घाटन दिलवर रामटेके यांच्या हस्ते, युवा विचारवंत व साहित्यिक प्रा. वैशाली रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सुषमा रामटेके राहतील. याप्रसंगी मार्गदर्शक व अतिथी म्हणून डॉ. ईश्वर नंदापुरे (पुणे), मोरेश्वर मेश्राम, प्रा. संजय मगर, उदय चक्रधर, नाशिर शेख, वामन मेश्राम उपस्थित राहतील. यानंतर डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. युवराज मेश्राम, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, डॉ. विजय मेश्राग, डॉ. प्रदिप भानसे हे ‘जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी साहित्य सक्षम ठरले आहे का?’ या विषयावर परिसंवादामध्ये विचार मांडणार आहेत.
तसेच दुपारी ३ वाजता कविसंमेलनात संपूर्ण राज्य व विदर्भाचे कवी, शाहीर यांची अनेक विषयांवर काव्य मैफिल रंगणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमासाठी संयोजक मुन्ना नंदागळवी व युगपुरूष युवा मंच समिती पिंपळगाव येथील कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)