शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 16:54 IST

शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु त्यांच्या तीन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

ठळक मुद्देवडिलांच्या मृत्यूने तिघ्या बहिणींच्या वाटेत अंधारपोवारीटोला-कोटजमुरा येथील घटना

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला-कोटजमुरा येथील गरीब शेतमजूर चंद्रप्रकाश रूपचंद दमाहे (४२) यांच्यासाठी दिवाळीच्या एक दिवसापूर्वीची १ नोव्हेंबरची सकाळ शेवटची सकाळ ठरली. शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु काळाने अशी झडप घातली की चंद्रप्रकाश दमाहे यांच्या तिन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

शेतमजुुराची कामे करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या चंद्रप्रकाशला तीन मुलीच असून त्या मुुलींना चांगले शिक्षण द्यावे व मोठे करावे, असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत होता. परंतु देवाला आणखी काही मंजूर असावे असेच म्हणावे लागेल. १ नोव्हेंबर रोजी गावात सर्वत्र दिवाळी साजरी करण्याची पूर्वतयारी सुरू असताना चंद्रप्रकाश नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जाण्यासाठी घरून निघाले. घरापासून अगदी काही पावलांवरच रस्त्यालगत महेश सहारे यांच्या जीर्ण घराची भिंत चंद्रप्रकाश यांच्या अंगावर पडली व जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे दमाहे कुटुंबाला एकच हादरा बसला.

गरीब शेतमजूर असलेल्या दमाहे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून गावातील काही लोकांनी घरमालकावर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चंद्रप्रकाशचा मृतदेहसुद्धा त्याच्या घरासमोर नेऊन ठेवला; परंतु याला काहीच अर्थ राहिला नाही. पोलिसांनी चंद्रप्रकाशचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करण्यास लावले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला जी काही थोडी फार मदत मिळणार होती ती सुद्धा मिळाली नाही.

चंद्रप्रकाशच्या या अपघाती निधनाने त्यांच्या मुली यशवनी दमाहे (१६), प्राची दमाहे (११) आणि कांचन दमाहे (८) अनाथ झाल्या आहेत. चंद्रप्रकाशची पत्नी गुणेश्वरी (३७) ही सतत आजारी राहत असून तिला कोणतेही काम करणे जमत नाही. यामुळे त्यांचे पुढील जीवन फारच कठीण झाले आहे. चंद्रप्रकाशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. तिला यशवनी ही मुलगी असून ती आता दहाव्या वर्गात शिकत आहे. चंद्रप्रकाशने नंतर दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीलाही दोन मुलीच झाल्या. यात प्राची पाचव्या वर्गात तर कांचन तिसऱ्या वर्गात शिकत आहे. शाळा शिकत असताना त्यांना पुढे काय करावे आणि काय नाही, याबद्दल मुळीच ज्ञान नाही.

भेट नाही अन् मदतही नाही

दमाहे कुटुंबावर दिवाळीच्या दिवशी संकटाचे एवढे मोठे आभाळ कोसळले असूनसुद्धा गावातील प्रमुख जबाबदार व्यक्तींनी त्यांच्या घरी येऊन मदत तर दिलीच नाही. शिवाय कुटुंबाचे सांत्वनसुद्धा करायला भेट दिली नाही. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनी १५ दिवस लोटूनसुद्धा दमाहे कुटुंबाला मदत देण्यासाठी कसलीही पावले उचलली नाही व भेट देणेसुद्धा जरुरी समजले नाही. त्यामुळे पोवारीटोला गावात लोकप्रतिनिधीं व अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा रोष आहे.

कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज

चंद्रप्रकाश दमाहे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंबाला दोन वेळचे जेवण दुर्लभ झाले आहे. तिघा मुुलींचे अख्खे आयुष्य समोर उभे असून त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. अशात शासन तसेच लोकप्रतिनिधींनी मुलींच्या भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जीवनात थोडाफार प्रकाश आणण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातSocialसामाजिकDeathमृत्यू