शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

त्याच्यासाठी ठरली 'ती' शेवटची सकाळ, मुलींवर कोसळले दुःखाचे आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 16:54 IST

शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु त्यांच्या तीन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

ठळक मुद्देवडिलांच्या मृत्यूने तिघ्या बहिणींच्या वाटेत अंधारपोवारीटोला-कोटजमुरा येथील घटना

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील पोवारीटोला-कोटजमुरा येथील गरीब शेतमजूर चंद्रप्रकाश रूपचंद दमाहे (४२) यांच्यासाठी दिवाळीच्या एक दिवसापूर्वीची १ नोव्हेंबरची सकाळ शेवटची सकाळ ठरली. शेजारच्या मातीच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर अचानक कोसळली आणि चंद्रप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबाची दिवाळी तर शोकमय अंधारात गेली. परंतु काळाने अशी झडप घातली की चंद्रप्रकाश दमाहे यांच्या तिन मुलींच्या वाटेवर अंधारच अंधार दिसून येत आहे.

शेतमजुुराची कामे करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या चंद्रप्रकाशला तीन मुलीच असून त्या मुुलींना चांगले शिक्षण द्यावे व मोठे करावे, असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत होता. परंतु देवाला आणखी काही मंजूर असावे असेच म्हणावे लागेल. १ नोव्हेंबर रोजी गावात सर्वत्र दिवाळी साजरी करण्याची पूर्वतयारी सुरू असताना चंद्रप्रकाश नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जाण्यासाठी घरून निघाले. घरापासून अगदी काही पावलांवरच रस्त्यालगत महेश सहारे यांच्या जीर्ण घराची भिंत चंद्रप्रकाश यांच्या अंगावर पडली व जागीच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे दमाहे कुटुंबाला एकच हादरा बसला.

गरीब शेतमजूर असलेल्या दमाहे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून गावातील काही लोकांनी घरमालकावर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चंद्रप्रकाशचा मृतदेहसुद्धा त्याच्या घरासमोर नेऊन ठेवला; परंतु याला काहीच अर्थ राहिला नाही. पोलिसांनी चंद्रप्रकाशचा मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करण्यास लावले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला जी काही थोडी फार मदत मिळणार होती ती सुद्धा मिळाली नाही.

चंद्रप्रकाशच्या या अपघाती निधनाने त्यांच्या मुली यशवनी दमाहे (१६), प्राची दमाहे (११) आणि कांचन दमाहे (८) अनाथ झाल्या आहेत. चंद्रप्रकाशची पत्नी गुणेश्वरी (३७) ही सतत आजारी राहत असून तिला कोणतेही काम करणे जमत नाही. यामुळे त्यांचे पुढील जीवन फारच कठीण झाले आहे. चंद्रप्रकाशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. तिला यशवनी ही मुलगी असून ती आता दहाव्या वर्गात शिकत आहे. चंद्रप्रकाशने नंतर दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीलाही दोन मुलीच झाल्या. यात प्राची पाचव्या वर्गात तर कांचन तिसऱ्या वर्गात शिकत आहे. शाळा शिकत असताना त्यांना पुढे काय करावे आणि काय नाही, याबद्दल मुळीच ज्ञान नाही.

भेट नाही अन् मदतही नाही

दमाहे कुटुंबावर दिवाळीच्या दिवशी संकटाचे एवढे मोठे आभाळ कोसळले असूनसुद्धा गावातील प्रमुख जबाबदार व्यक्तींनी त्यांच्या घरी येऊन मदत तर दिलीच नाही. शिवाय कुटुंबाचे सांत्वनसुद्धा करायला भेट दिली नाही. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनी १५ दिवस लोटूनसुद्धा दमाहे कुटुंबाला मदत देण्यासाठी कसलीही पावले उचलली नाही व भेट देणेसुद्धा जरुरी समजले नाही. त्यामुळे पोवारीटोला गावात लोकप्रतिनिधीं व अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा रोष आहे.

कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज

चंद्रप्रकाश दमाहे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंबाला दोन वेळचे जेवण दुर्लभ झाले आहे. तिघा मुुलींचे अख्खे आयुष्य समोर उभे असून त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. अशात शासन तसेच लोकप्रतिनिधींनी मुलींच्या भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जीवनात थोडाफार प्रकाश आणण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :AccidentअपघातSocialसामाजिकDeathमृत्यू