शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

३०० ब्रास रेतीचा केला साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:37 PM

तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.

ठळक मुद्देवाघ नदीच्या पात्रातून उपसा : ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.शासनाने ज्या रेती घाटांचा लिलाव केला. त्या घाटातील रेती काढणे सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणच्या रेतीचा घाटांचा लिलाव झाला नाही. त्या घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करुन रेती विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. नियमाला धाब्यावर बसवून रात्री ९ ते पहाटे ४ वाजतापर्यंत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यासंदर्भात ग्रामपंचायत पिपरटोलाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत रेतीचा उपसा करु नका अशी ताकीद रेती माफीयांना दिल्यामुळे रेती माफीयांनी उलट त्यांनाच ठार मारण्याची धमकी दिली आहे. वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरण्यात आली. चोरलेल्या रेतीपैकी ३०० ब्रास रेतीचा साठा पिपरटोला येथे करुन ठेवल्याचे सरपंचांनी सालेकसाचे ठाणेदार, आमगावचे तहसीलदार, देवरी येथील उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्षरेतीचा उपसा करणाऱ्या रेतीमाफीयांना महसूल विभागाचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार हे रेती माफीयांवर कारवाई करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये महसूल विभागाप्रती आक्रोश आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतरही रेती माफीयांवर कारवाई केली जात नसल्याने याप्रकराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.१ लाख १५ हजारांचा एकही दंड नाहीरेती माफीयावर अंकुश बसावा यासाठी शासनाने रेती चोरणाऱ्यांना १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड करावा असे शासन निर्णयात म्हटले आहे. हा शासन निर्णय निघण्यापूर्वी येथील तहसीलदारांनी रेती चोरणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला होता. परंतु यंदा चार कोटींचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना एकही रेती माफीयाकडून १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नाही. शासन निर्णय निघून चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकावर ही दंड झाला नाही. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :sandवाळू