दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST2021-05-17T04:27:55+5:302021-05-17T04:27:55+5:30

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. ...

They are becoming angels for patients in remote areas | दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. परिणामी या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्याचे व रुग्ण बरे करण्याचे काम डॉ. पिंकू मंडल यांनी केले. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सिटी स्कॅन स्कोअर सात, आठ, नऊ, दहा, बारापर्यंत होता, अशा रुग्णांना या ठिकाणी औषध उपचार करून पूर्णत: तंदुरुस्त करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना काळात परिसरातील रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले.

कोरोना बाबतीत जी समस्‍या निर्माण झाली होती, त्या समस्येतून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले. जे रुग्ण क्रिटिकल होते, त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले. एकंदरीत या परिसरात जे भयभीत वातावरण तयार झालेले होते, त्या वातावरणातून निवारण करण्याचे काम डॉ. मंडल यांनी केले. कोरोनाबाधित असलेल्या सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसणार होता, त्या आर्थिक विवंचनेतून सोडविण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. आदिवासी बहुल भागामध्ये जवळपास पंधरा वर्षे ते अविरतपणे सेवा करीत आहेत. केशोरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील ज्या समस्या होत्या, त्या त्यांनी त्वरित सोडविल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राला एक स्वच्छ परिसर, पारदर्शक करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरोग्य केंद्रास भेट दिली तर आरोग्य केंद्राचा एक सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो. आरोग्य केंद्रामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंब नियोजन या मोहिमेला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. शंभर टक्के कुटुंब नियोजनाचे कामसुद्धा त्यांनी केले. या परिसरातील ज्या व्यक्तीने विष प्राशन केलेले असते, त्या व्यक्तींना कुठे न पाठविता त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करून त्या रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली वैद्यकीय सेवा करून इतर वेळेत ते रुग्णांची सेवा करतात.

.....

शिस्त पाळली तर हा संसर्ग टाळता येतो

नागरिकांनी शिस्त पाळली तर प्रशासनावरील ताण कमी होईल. काही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषध उपचार केला तर खरा आजार लपेल आणि नंतर भयानक रूप घेऊन पुढे येईल. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. स्वयंशिस्त औषधापेक्षाही प्रभावी असून, तीच आपल्या संकटाला सावरेल, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.

Web Title: They are becoming angels for patients in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.