शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 17:01 IST

५० हजार मजुरांचा रोजगार हिरावला : दोन महिन्यापासून निर्यातबंदी, जिल्ह्याचे वैभव हरवतेय

अंकुश गुंडावार

गोंदिया : जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. धान या भागातील मुख्य पीक असल्याने त्यावर आधारित अरवा आणि उष्णा अशा ३०० वर राईस मिल जिल्ह्यात आहे. यातून जवळपास ५० हजारांवर मजुरांना राेजगार मिळतो. तर येथील तांदूळ देशविदेशात मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. त्यामुळे यावर आधारित राईस मिल उद्योग देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण यंदा ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने नान बासमती (अरवा) तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तर उष्णा तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क आकारले. त्यामुळे तांदळाची निर्यात मागील दोन महिन्यांपासून बंद झाल्याने जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली असून अर्थचक्र बिघडल्याचे चित्र आहे.

पूर्व विदर्भातीलगोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या पाच जिल्ह्यांत प्रामुख्याने धानाची १५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. या भागात उत्पादित होणाऱ्या तांदळाचा दर्जा चांगला असल्याने त्याला देश आणि विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बासमती, नानबासमती, उष्णा तांदूळ, ब्राऊन राईस या सर्व तांदळाची दरवर्षी १९८ लाख मेट्रिक टन तांदळाची निर्यात या भागातून केली जाते. त्यामुळे यावर आधारित राईस मिल उद्योग या भागात मोठ्या प्रमाणात आहे. पूर्व विदर्भात एकूण ७८९ राईस मिल असून यावर उद्योगातून जवळपास ७० हजार लोकांना रोजगार मिळतो. तसेच याच उद्योगावर प्रामुख्याने या भागातील अर्थचक्र चालते. शासनाच्या धोरणामुळे मागील काही वर्षांपासून हा उद्योग आधीच डबघाईस आला आहे. त्यातच आता सप्टेंबर महिन्यापासून शासनाने अरवा तांदळावर निर्यातबंदी आणि उष्णा तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावल्याने तांदळाची निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून राईस मिलची चाके थांबल्याने ७० हजारावर मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर राईस मिल उद्योग डबघाईस आल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. केंद्र या धोरणात अद्यापही कुठलीही सुधारणा केली नाही त्यामुळे राईस मिल उद्योगाचे अर्थचक्र बिघडले असून, याचा परिणाम तांदळाच्या दरावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तांदूळ अतिरिक्त झाल्याने दरावर परिणाम

भारतीय खाद्य महामंडळाकडे सध्या स्थितीत ४०० लाख मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. तर सन २०२३-२४ या हंगामातील १०८० मेट्रिक टन तांदूळ पुन्हा जमा होणार आहे. त्यामुळे तांदळाचा अतिरिक्त स्टाॅक होण्याची शक्यता आहे. तर ७० टक्के तांदूळ सरकार स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात उपलब्ध करून देते. त्यामुळे तांदळाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. तांदळाच्या निर्यातीवर बंदी असल्याने तांदळाच्या दरवाढीवर परिणाम होण्याची शक्यता राईस मिल उद्योजकांनी वर्तविली आहे.

या उपाययोजना केल्या तरच सुधारणा

केंद्र सरकारने तांदळावरील निर्यातीबंदी त्वरित हटवावी, उष्णा तांदळावरील २० टक्के निर्यातकर त्वरित रद्द करावा, ५० डॉलर प्रतिटन असा फिक्स निर्यात कर लागू करावा, तांदळाची निर्यातबंदी अधिक काळ बंद राहिल्यास विदेशी देश भारताऐवजी दुसऱ्या देशातून तांदूळ खरेदी करतील. याचा नेहमीसाठी येथील उद्योगावर परिणाम होईल. त्यामुळे केंद्र सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन सुधारणा करण्याची गरज आहे.

तांदळाची विदेशात होणारी निर्यात

तांदूळ             होणारी निर्यात

बासमती             ४७ लाख मेट्रिक टन

उष्णा तांदूळ ८० लाख मेट्रिक टन

अरवा तांदूळ ६५ मेट्रिक टन

ब्राऊन तांदूळ ५ मेट्रिक टन

केंद्र सरकारने २३ ऑगस्टपासून उष्णा तांदळावर २० टक्के निर्यातकर आणि अरवा तांदळावर निर्यातबंदी लागू केली आहे. त्यामुळे निर्यात पूर्णपणे थांबल्याने मागील दोन महिन्यांपासून राईस मिल पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे ७० हजारांवर मजुरांचा रोजगार हिरावला आहे, तर राईस मिल उद्योग डबघाईस आला आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित मागे घेण्याची गरज आहे.

- अशोक अग्रवाल, अध्यक्ष, विदर्भ राईस मिल असोसिएशन

टॅग्स :Marketबाजारbusinessव्यवसायgondiya-acगोंदियाPaddyभात