शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भरधाव कार झाडाला धडकून उलटली; चार तरुण ठार, दाेन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 10:40 IST

खोब्याजवळ भीषण अपघात, सौर पंप फिटिंगचे काम करून परतताना दुर्घटना

नवेगावबांध (गोंदिया) : शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप फिटिंगचे काम करून कारने आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांची कार झाडाला धडकली, त्यानंतर ती उलटली. या भीषण अपघातात चार तरुण ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी खोबा जंगल परिसरात झाला.

या अपघातात रामकृष्ण योगराज बिसेन (२४), सचिन गोरेलाल कटरे (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संदीप जागेश्वर सोनवाने (१८, रा. नवेगाव, ता. आमगाव) व चालक वरुण नीलेश तुरकर (२७, रा. भजेपार, तालुका आमगाव) यांचा उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे मृत्यू झाला. तर मधुसूदन नंदलाल बिसेन (२३) व प्रदीप कमलेश्वर बिसेन (२४, रा. नवेगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

हे सहाही तरुण आमगाव तालुक्यातील भजेपार व नवेगाव येथील रहिवासी असून, ते सौर पंप फिटिंगचे काम करतात. बुधवारी ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप फिटिंग करण्याचे काम करण्यासाठी गेले होते. सौर पंप फिटिंगचे काम झाल्यानंतर ते रात्री टाटा नेक्सान क्रमांक एमएच-३५/एजी-८७७१ या कारने आमगावकडे परत येत होते. दरम्यान, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक देऊन उलटली. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी खोबा जंगलात घडली. यात कारमध्ये असलेल्या सहापैकी चार युवकांचा मृत्यू झाला तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

दरम्यान, हा प्रकार या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती डुग्गीपार व नवेगावबांध पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार संजय पांढरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चारही मृतक युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आले. या घटनेची नोंद डुग्गीपार व नवेगावबांध पोलिसांनी घेतली आहे.

अन् नवेगावबांध येथील काम ठरले शेवटचे

अपघातात ठार झालेले चार तरुण हे मित्र असून, ते एकत्रितपणे सौर पंप फिटिंगचे काम करीत असल्याचे बोलले जाते. नवेगावबांध येथे सौर पंप फिटिंग करण्यासाठी बुधवारी सकाळीच गेले होते. हे काम रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आटोपले. यानंतर ते त्यांच्या कारने आमगावकडे आपल्या गावी परतण्यासाठी निघाले. मात्र सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी जंगलात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgondiya-acगोंदिया