शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

हत्तीचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना; खरीप हंगामाला मुकण्याची वेळ

By अंकुश गुंडावार | Updated: July 20, 2023 18:11 IST

शिवरामटोला, भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली गस्त

केशोरी (गोंदिया) : मागील आठ दिवसांपासून हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास या कळपाने उमरपायलीपासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या शिवरामटोला, भरनाेली, राजोली या परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालून २० शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. परिणामी शेतकऱ्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. हत्तीचा कळप या परिसरातून परत जात नसल्याने नुकसानीच्या चिंतेने शेतकऱ्यांना चैन पडत नसल्याचे चित्र आहे.

मागील पश्चिम बंगाल मधून २५ ते ३० हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले होते. दोन महिने या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. एका शेतकऱ्याचा बळी घेतला होता एका शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते. तर नागणडोह येथील २० ते २५ झोपड्या भूईसपाट केल्याने तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची वेळ आली. त्यानंतर हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. मात्र आठ दिवसांपुर्वी हा कळप पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली येथे या कळपाने शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाच्या पऱ्ह्यांचे नुकसान केले. त्यानंतर या कळपाने आपला मोर्चा उमरपायलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिवरामटोला,राजोली, भरनोली या गावाकडे वळविला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेतशिवारात धुमाकूळ घालूृन धानाच्या पऱ्हयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पऱ्हे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. खरीप हंगामाची कामे करायची की हत्तीच्या कळपासाठी जागरण अशी बिकट समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

वन विभागाने वाढविली गस्त

हत्तीच्या कळपाने नुकसान केलेल्या धानाच्या पऱ्ह्यांची वनपरिक्षेधिकारी व्ही.बी.तेलंग, ए.आर.मेश्राम, वनरक्षक वाय. जी. परशुरामकर यांनी गुरुवारी (दि.२०) घटनास्थळी भेट पाहणी केली. तसेच पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. तसेच शिवरामटोला, राजोली, भरनोली या परिसरातील वन विभागाची गस्त वाढविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर हंगामाला मुकण्याची वेळ

हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घालून धानाच्या पऱ्ह्यांचे नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पऱ्हे आणायचे कुठून असा प्रश्न सखाराम कुंभरे, दानच कुंभरे, कृष्णा कुंभरे, भगवान वट्टी, ग्यानीराम नरेटी, मंसाराम नरेटी, नानू नरेटी, रतिराम गावळे, अतिराम नरेटी, तितराम होळी, पारबता कोटंगे, सुनील बुध्दे, देविदास कोरेटी, रामबत्ती गावळे या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागgondiya-acगोंदियाFarmerशेतकरी