शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:26 IST

दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देकायम विनाअनुदानीत विद्यालय। माहितीचा अभाव, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान, यंदा करणार जनजागृती

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यातील दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात अनुदानीत, कायम विना अनुदानीत आणि स्वंयअर्थसाह्यीत विद्यालय आहेत. यापैकी अनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ आणि १२ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनातंर्गत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शिष्यवृत्ती दिली जात असल्याची माहितीच दिली जात नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यात ११५ कायम विना अनुदानीत शाळा व विद्यालय असून यामध्ये १५ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शासनाच्या निर्णयानुसार खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत ११ आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना वार्षिक १८०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.यामुळे विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचा आणि शैक्षणिक खर्च भागविण्यास थोडीफार मदत होत असते. आर्थिक अडचणीमुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा देखील शासनाचा या मागील हेतू आहे. मात्र कायम विनाअनुदानीत विद्यालयात इयत्ता ११ व १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्तीच मागील तीन चार वर्षांपासून मिळत नसल्याची माहिती आहे.लोकमतने याची खोलात जावून चौकशी केली असता कायम विना अनुदानीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुध्दा या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यास ही विद्यालये असमर्थ ठरत आहे. पण याचा फटका जिल्ह्यातील विविध प्रवर्गातील १० हजारावर विद्यार्थ्यांना बसत असून बºयाच विद्यार्थ्यांना मोलमजुरी करुन शिक्षण घ्यावे लागत आहे.सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यातच समस्याराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गृह जिल्ह्यातच कायम विना अनुदानीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेच्या माहितीअभावी शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. हा प्रकार मागील दोन तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती असून याकडे संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाले आहे.शिष्यवृत्ती योजनांपासून विद्यालय अनभिज्ञशासनातर्फे खुला प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या विविध योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आर्थिक मदत होते. मात्र या योजनांची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाच नसल्याची बाब पुढे आली आहे. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.बºयाच विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती नाही. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी यंदा यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेवून त्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाईल. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवू.- ए.पी.कछवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.गोंदिया.स्वंयअर्थसहाय्यीत विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद नाही. मात्र याही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.- मंगेश वानखेडे, समाज कल्याण उपायुक्त गोंदिया.पदवीचे शिक्षण घेताना अडचणकायम विना अनुदानीत विद्यालयांमध्ये १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. तेव्हा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात. मात्र ११ वी आणि १२ वी मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेवू न शकल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गेल्यावर आधी शिष्यवृत्तीचा लाभ का घेतला नाही याचा ठोस कारण द्यावे लागते. त्यामुळे मोठी अडचण होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती