शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

दात गळतात, हिरड्यांतून रक्तस्राव; 'स्कर्वी' आजार कशामुळे होतो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:29 IST

लक्षणे दिसताच घ्या दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला : दुर्लक्ष केल्यास आजारात होवू शकते वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तुमच्या शरीरात क जीवनसत्त्वाच्या (अॅस्कॉर्बिक आम्ल) तीव्र कमतरतेमुळे 'स्कर्ती' हा आजार होऊ शकतो, जो कमी पोषणाशी संबंधित आहे. हा तुम्हाला अशक्त बनवू शकतो. रक्तक्षय होऊ शकतो आणि तुमच्या त्वचेखाली रक्तस्राव होऊ शकतो. हिरड्यांमधून रक्त येणे हे 'स्कर्ती'चे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे.

'स्कर्ती' हा क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. क जीवनसत्त्वाचा स्रोत एस्कॉर्बिक आम्ल आहे. क जीवनसत्त्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आणि ऑक्सिइनरोधी आहे. हे शरीराच्या सर्व भागांतील ऊतींच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये मदत करते. तसेच हाडे आणि दात टिकवून ठेवते आणि लोह शोषण्यास मदत करते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, थकवा जाणवणे, कुरळे केस आणि हात पाय दुखणे यांचा समावेश होतो.

दुर्लक्ष करून चालणार नाहीहिरड्यांतून रक्त येणे ही मूलभूत समस्या असून, अनेकांना या आजाराचा सामना करावा लागतो. हिरड्या हा संवेदनशील भाग आहे. अनेक वेळा ब्रश केल्यानंतरही हिरड्यांमधून रक्त येते. मात्र, हिरड्यांमधून वारंवार रक्तस्राव होत असेल तर ते काळजीचे कारण आहे. कारण हिरड्यांमधून रक्त येण्याची विविध कारणे असू शकतात. काही वेळा हिरड्यांमधून रक्त येणे कर्करोगाचेसुद्धा लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे मधुमेह असेल किंवा हिरड्यांच्या विकारांमुळेसुद्धा रक्त येऊ शकते. त्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे दुर्लक्षित करून चालणार नाही. याकरिता दंतरोगतज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे आहे.

हिरड्यांतून रक्तस्रावाची कारणेपेरिओडॉन्टायटीस हा हिरड्यांचा आजार आहे. या आजारावरील उपचार करणे गरजेचे आहे. या आजारावर वेळेत उपचार न केल्यास दातांचे संरक्षण करणाऱ्या टिश्यू (उती) आणि हाडांवर याचा बदल जाणवण्यास सुरुवात होते. यामध्ये हिरड्या सुजतात, ज्यामुळे दात मुळापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू होते. हिरड्यांमधून रक्तप्रवाह असाच सुरू राहिला तर पेरिओडॉन्टायटीसचे हे लक्षण असू शकते.

काय काळजी घ्याल?मौखिक आरोग्याची काळजी राखणे गरजेचे आहे, तसेच दिवसातून दोनदा दात घासणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहणे. संतुलित आहार आणि व्यायाम करून स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे, आहारात हिख्या पालेभाज्यांचा वापर तसेच मोसमानुसार उपलब्ध असलेली ताजी फळे खावीत. 

डॉक्टरांना कधी भेटायचं?हिरड्यांमधील रक्तस्राव वारंवार होत असेल तर डॉक्टरांना भेटून घेणे गरजेचे आहे. वर्षातून किमान एकदा दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे गरजेचे आहे

रक्तस्राव आणि निदान

  • रक्ताचा कर्करोग : ल्युकेमिया या कर्करोगात हिरड्यांतून रक्तस्राव होत असतो. कर्करोग असल्याने प्लेटलेट्सची संख्या कमी होते. परिणामी, रक्तस्राव थांबणे अशक्य होते.
  • मधुमेह : ज्या व्यक्तींना मधुमेह होतो त्यावेळी त्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यावेळी अशा व्यक्तींना हिरड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असून, त्यामुळे त्यातून रक्त येण्याची शक्यता असते.
  • निदान : हिरड्यांतून रक्त येणे थांबत नसेल तर तत्काळ दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण हिरड्यांतून रक्त येणे चांगले लक्षण नव्हे. आरोग्याच्या अन्य व्याधींमुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. दंतरोगतज्ज्ञ तोंडाची तपासणी करून रक्त येण्यामागे नेमके कारण काय ते शोधून काढतात. काही वेळा सहव्याधी आहेत का, याची तपासणी केली जाते.

"सहव्याधीमुळे हिरड्यांमधून रक्त येणे हा एक प्रकार आहे. मात्र, त्यापेक्षा हिरड्यांमधून रक्त येण्याचे मूलभूत कारण म्हणजे 'व्हिटॅमिन सी'ची कमतरता. अनेक वेळा मधुमेहींना हा त्रास जाणवत असतो, तर काही वेळा दातावरील कॅप या वर्षानुवर्षे तशाच राहिल्यामुळे त्या ठिकणी संसर्ग निर्माण होऊन त्या दाताच्या अवतीभोवती असणारी हिरडी सुजते आणि रक्त येते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मौखिक आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे असते. वर्षातून किमान एकदा दंतरोगतज्ज्ञांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे."- डॉ. श्रीकांत राणा, दंतरोगतज्ज्ञ, आमगाव

टॅग्स :Dental Care Tipsदातांची काळजीHealthआरोग्यgondiya-acगोंदिया