शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:09 IST

योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे.

ठळक मुद्देलोक चळवळीसाठी हवाय पुढाकार : जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे.सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही.परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास उद्याच्या पिढीला पाणी मिळणार. यासाठी सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.वर्धा नगर पालिकेचा स्तुत्य उपक्रमखोलवर जात असलेली पाण्याची पातळी व पाणी टंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वर्धा नगरपालिकेने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जिरविण्यावर जोर दिला जात आहे. यात शहरवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नगर परिषदेने मालमत्ता करात दोन टक्के सवलत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेनेही असाच उपक्रम हाती घेतल्यास गोंदियात त्यांचे चांगले परिणाम बघता येणार यात शंका नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.दंडात्मक कारवाईची गरजशहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसत आहे. अशात प्रशासनाकडून पाण्याचा जपून करण्याबाबत आवाहन केले जात आहे. असे असतानाही मात्र कित्येकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जात आहे.मात्र सामान्य नागरिक यावर काहीच करू शकत नाही. अशात जिल्हा प्रशासनाने विशेष फिरते पथक गठीत करून अशा प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय करताना कुणीही दिसल्यास त्याला लगेच दंड आकारल्यास नक्कीच अशांना पाण्याचे मोल कळणार असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई