शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:09 IST

योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे.

ठळक मुद्देलोक चळवळीसाठी हवाय पुढाकार : जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे.सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही.परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास उद्याच्या पिढीला पाणी मिळणार. यासाठी सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.वर्धा नगर पालिकेचा स्तुत्य उपक्रमखोलवर जात असलेली पाण्याची पातळी व पाणी टंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वर्धा नगरपालिकेने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जिरविण्यावर जोर दिला जात आहे. यात शहरवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नगर परिषदेने मालमत्ता करात दोन टक्के सवलत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेनेही असाच उपक्रम हाती घेतल्यास गोंदियात त्यांचे चांगले परिणाम बघता येणार यात शंका नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.दंडात्मक कारवाईची गरजशहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसत आहे. अशात प्रशासनाकडून पाण्याचा जपून करण्याबाबत आवाहन केले जात आहे. असे असतानाही मात्र कित्येकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जात आहे.मात्र सामान्य नागरिक यावर काहीच करू शकत नाही. अशात जिल्हा प्रशासनाने विशेष फिरते पथक गठीत करून अशा प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय करताना कुणीही दिसल्यास त्याला लगेच दंड आकारल्यास नक्कीच अशांना पाण्याचे मोल कळणार असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई