शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:09 IST

योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे.

ठळक मुद्देलोक चळवळीसाठी हवाय पुढाकार : जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे.सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही.परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास उद्याच्या पिढीला पाणी मिळणार. यासाठी सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.वर्धा नगर पालिकेचा स्तुत्य उपक्रमखोलवर जात असलेली पाण्याची पातळी व पाणी टंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वर्धा नगरपालिकेने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जिरविण्यावर जोर दिला जात आहे. यात शहरवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नगर परिषदेने मालमत्ता करात दोन टक्के सवलत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेनेही असाच उपक्रम हाती घेतल्यास गोंदियात त्यांचे चांगले परिणाम बघता येणार यात शंका नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.दंडात्मक कारवाईची गरजशहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसत आहे. अशात प्रशासनाकडून पाण्याचा जपून करण्याबाबत आवाहन केले जात आहे. असे असतानाही मात्र कित्येकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जात आहे.मात्र सामान्य नागरिक यावर काहीच करू शकत नाही. अशात जिल्हा प्रशासनाने विशेष फिरते पथक गठीत करून अशा प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय करताना कुणीही दिसल्यास त्याला लगेच दंड आकारल्यास नक्कीच अशांना पाण्याचे मोल कळणार असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई