विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ स्टडी’ करणे गरजेचे
By Admin | Updated: May 22, 2014 01:16 IST2014-05-22T01:16:31+5:302014-05-22T01:16:31+5:30
आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही.

विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ स्टडी’ करणे गरजेचे
गोंदिया : आजच्या पिढीला फेसबूक, व्हॉट्सअँप व मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामुळे शाळा व ट्यूशन मध्ये झालेल्या अभ्यासा व्यतिरीक्त विद्यार्थी पुस्तकांना हात लावत नाही. मात्र शाळा व ट्यूशन सोडून विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा. कारण सेल्फ स्टडी सवरेत्तम असते असे मत येथील साकेत पब्लीक स्कूलचे संचालक चेतन बजाज यांनी व्यक्त केले. नुकतेच जाहीर झालेल्या सीबीएसई अभ्यासक्रमातील दहाव्या वर्गात साकेत पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांंनी विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. शाळेच्या या घवघवीत यशा घेऊन बजाज यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. बजाज म्हणाले, मागील सात वर्षांपासून शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम आहे. दरवर्षी शाळेचा निकाल १00 टक्के लागतो. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांंनी विदर्भ गाठून शाळेचा किर्तीमान स्थापीत केला. या यशात खरी मेहनत विद्यार्थ्यांंची असून आम्ही आपले कर्तव्य पार पाडले. शाळेतील विद्यार्थ्यांंकडे सुरूवातीपासूनच लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांंना अभ्यासात येणार्या शंकांना दूर करण्यासाठी शिक्षकांनी २४ तास त्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे बिहार राज्यातून काही शिक्षक विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यासाठी आणले आहेत. हे शिक्षक व स्वत: आम्हीही विद्यार्थ्यांंना प्रोत्साहीत करीत होतो. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांंना लागणारे वातावरण, साहीत्य व पुस्तका त्यांना उपलब्ध करवून दिल्याचे ते म्हणतात. बजाज म्हणतात, मिळालेले यश गैरवाची बाब आहे. मात्र ते टिकवून ठेवणे ही त्यापेक्षा जास्त महत्वाची बाब आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी तत्पर आहोत्. विद्यार्थ्यांंना संदेश देताना ते म्हणतात, शाळा व ट्यूशन पेक्षा सेल्फ स्टडी महत्वाची आहे. या व्यतिरीक्त दररोज पाच-सहा तास विद्यार्थ्यांंनी अभ्यास करायला हवा. यात आलेल्य शंका शिक्षकांकडून दूर करून घ्याव्यात यातून यशाचे मार्ग नक्कीच उघडणार. सोबतच पालकांनीही जागरूक रहावे. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहीत करणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांंवर अभ्यासाचा भार लादणे व भिती दाखविणे हे कार्य न करता प्रोत्साहीत करून अभ्यासाप्रती आकर्षीत करण्याची खरी गरज असल्याचे बजाज म्हणाले. (शहर प्रतिनिधी)