शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पत्रातून साधली विद्यार्थ्यांनी ‘मैत्री’

By admin | Updated: March 18, 2015 01:00 IST

ज्यांनी आपल्याला आनंद व ज्ञान दिले त्यांना धन्यवाद द्या, या प्रवीण दखनेंच्या विधानातून प्रेरणा घेऊन पलखेडा येथील...

नरेश रहिले  गोंदियाज्यांनी आपल्याला आनंद व ज्ञान दिले त्यांना धन्यवाद द्या, या प्रवीण दखनेंच्या विधानातून प्रेरणा घेऊन पलखेडा येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून ‘पत्रमैत्री’ उपक्रम शिक्षक युवराज माने यांच्या मार्गदर्शनात सुरू केला. या उपक्रमातून विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थी लेखनास प्रवृत्त व्हावे व सामाजिक सुसंस्कार व्हावेत यासाठी पत्रमैत्री उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना लेखक समजतो. मात्र प्रत्यक्ष लेखकच त्यांच्या भेटीला आले तर त्याचा आनंद काही औरच. असाच प्रत्यय या पत्रमैत्रीतून आला. लेखिका डॉ.संध्या पवार मुलांनी पाठविलेल्या पत्रामुळे भारावून गेल्या. त्या प्रत्यक्ष भेटण्यासाठी शाळेत आल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांना भेटवस्तूही दिल्या. बालभारतीचे सुहास परळे यांनी मुलांना पुस्तक भेट म्हणून २२०० रूपये शाळेला पाठविले. पुण्यातील लेखिका मेघाताई इनामदार यांनी १५०० रूपयांचा धनादेश पाठविला. या पैशातून विद्यार्थ्यांनी शाळेत वृक्षारोपण केले. मुलांनी पाठविलेले ग्रिटींग व लेखनाविषयी कळविले. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवर आनंदीत होऊन राजेंद्र कांबळे यांनी १००० रूपये व पुस्तक भेट दिले. या शाळेतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवीण दवने, डॉ.आ.क.साळुके, ‘किशोर’चे संपादक शिवाजी देशमुख, किरण केंद्रे, डॉ.संध्या पवार, डॉ.प्रतिमा विश्वास, आबा महाजन, इंद्रजीत भालेराव, एकनाथ आवाड, संजय सांगडे, सुहास बारटक्के या लेखकांचा पत्ररूपी आशीर्वाद मिळाला. या उपक्रमाचे शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे, मुख्याध्यापिका खोब्रागडे, केंद्रप्रमुख आर.आर. अगडे यांनी कौतुक केले.