शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना एसटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 9:45 PM

शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.

ठळक मुद्देअहिल्याबाई होळकर योजना : १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.ग्रामीण भागात आजही कित्येक गावांत शिक्षणाची सोय नसल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. गावात शाळा किंवा महाविद्यालय नसल्याने परगावी शिक्षणासाठी जाऊ देण्याची परवानगी आजही पालक देत नाहीत. यात कित्येकांना मुलींच्या बाहेरगावी ये-जा करण्याचा खर्च परवडणारा नसतो. अशात मुलींना मन मारून शिक्षण मधातच सोडावे लागते. मात्र ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षण घेऊन पुढे जाता यावे. यासाठी ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करून दिली.यासाठी ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना’राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वर्ग ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा होती.१० वी नंतरच्या विद्यार्थिनींना या योजनेतून वगळण्यात आले होते. अशात अशा मुलींचे १० वी नंतरचे शिक्षण धोक्यात येत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती वाढवून १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सोय मिळत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींनी आपले पास काढून घेतले असून मोफत प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत.१० वी पर्यंतच्या २५३६ विद्यार्थिंनीना सवलतअहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना पूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी होती. या गटातील विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनींनी या योजनेतंर्गत आपले पास काढून घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनी या योजनेच्या लाभार्थी असून शिक्षणासाठी योजनेंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.आॅक्टोबर महिन्यात निघाले आदेशयापूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही योजना राबविली जात होती. मात्र १२ वी पर्यंतच्या कित्येक विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. अशात अशा विद्यार्थिनींना शिक्षणात किमान प्रवासाची तरी सुविधा देता यावी या दृष्टीकोनातून ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेत बदल करण्यात आला. यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये तसे आदेश काढण्यात आले आहेत.