शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

्रकाही भागात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 10, 2014 00:19 IST

शहरातील नागरिकांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातर्गंत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सदर योजना ३० ते ४० वर्ष जूनी असून...

 गोंदिया : शहरातील नागरिकांना महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातर्गंत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सदर योजना ३० ते ४० वर्ष जूनी असून या योजेनची पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून दूषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील गांधी वॉर्ड तसेच सूर्याटोला, गौतमनगर, छोटा गोंदिया, शास्त्रीवार्ड या परिसरातील काही भागात दूषीत पाण्याचा पुरवठा नेहमीच होत असतो. कधी कधी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाकडून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या ४० वर्षे जुन्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर पाईपलाईन ठिकठिकाणाहून लिकेज झाल्यामुळे नालीतील पाणी शिरून सदर दूषीत पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. शहरात ४९० बोरवेल असून यापैकी बर्‍याच बोरवेल नादुरस्त आहेत. तर काही बोरवेलचे पाईपदेखील कुजले आहेत. शिवाय सार्वजनिक विहिरीमधील गाळाचा उपसा बर्‍याच दिवसांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे अशुध्द पिण्याचे पाणी पुरवून पालिका प्रशासन नागरिकांच्या जिववार उठल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करित आहेत. गांधीवार्ड ही वस्ती शहरातील सर्वात जुना भाग आहे. या ठिकाणी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या नळांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. याशिवाय हातपंप व सार्वजनिक विहिरी देखील आहेत. मात्र, तिन्ही स्त्रोतांतील पाणीपुरवठा दूषीत असल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोहर चौक ते सतीबोळी चौक, मोहन रामटेककर यांचे घर ते जगदेवप्रसाद मिश्रा यांच्या घरापर्यंत असलेल्या महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेज आहेत. पाईपलाईन सांडपाण्याच्या नाल्यामधून टाकण्यात आली आहे. नालीतील दूषित पाणी पाईपमध्ये जाऊन ते नागरिकांना पिणे भाग पडत आहे. बोरवेल आहेत मात्र त्यांचे पाईपदेखील कुजले आहेत. पाण्याबरोबर गंज येत आहे. तसेच सार्वजनिक विहिरींमधील गाळाचा उपसा गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आला नाही. तर बोरवेलची कित्येक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नसल्यामुळे बर्‍याच बोरवेल नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून राहुन आपली तहान भागवावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. पाईपलाईनला मोटार जोडून चोरी काही उच्चभू्र आणि स्वत:ला मोठे समजणार्‍यांनी जीवन प्राधिकरणाच्या नळांना विद्युत मोटार लावून तिसर्‍या माळ्यापर्यंत पाणी ओढणे सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी असलेल्या नळांना योग्यरीत्या पाण्याचा पुरवठा होत नाही. या प्रकाराकडे पालिका आणि जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)