शिबिरातून शोधले ‘समाधान’
By Admin | Updated: September 1, 2015 01:57 IST2015-09-01T01:57:29+5:302015-09-01T01:57:29+5:30
महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेंतर्गत धनेगाव (दरेकसा) येथे माँ कंकाली

शिबिरातून शोधले ‘समाधान’
दरेकसा : महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेंतर्गत धनेगाव (दरेकसा) येथे माँ कंकाली देवस्थान कचारगढच्या प्रांगणात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात या शिबिराच्या निमित्ताने अधिकारीगण उपस्थित असल्याने नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यावर अधिकाऱ्यांनीही योग्य तो प्रतिसाद देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशीे होते. दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सालेकसाचे तहसीलदार सांगोळे, जमाकुडोच्या सरपंच किरण मोहबे, कोसमतर्राच्या सरपंच पूजा वरकडे व तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांचे जाती प्रमाणपत्रासाठी कागदपत्र तयार करुन देण्यात आले. तसेच शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी खंडविकास अधिकारी मोटघरे, उपविभागीय अभियंता नागभिरे, अभियंता दमाहे, प्राचार्य रहांगडाले व गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश रहांगडाले यांनी व आभार तहसीलदार सांगोडे यांनी मानले. (वार्ताहर)
नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
४या शिबिरामध्ये लोकांनी आपली आपली समस्या मंचावर ठेवली. विशेष म्हणजे मानव विकास कार्यक्रमांतर्गत चालविण्यात येणाऱ्या एसटी बसला चांदसुरज चौकी, विचारपूरपर्यंत विस्तारीत करण्यात यावे याबाबतचे निवेदन श्री गुरुदेव हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी एसडीओ सूर्यवंशी यांना दिले. ही बसफेरी त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच धनेगाव ते बंजारी रस्त्याचे हाल दयनीय आहे. बसने येणाऱ्यांकरिता असुविधा होत आहे. कोसमतर्राचे उपसरपंच बारेलाल वरकडे यांनी ज्योत विसर्जनाकरिता कचारगडमध्ये पाणी टंचाई राहात असल्यामुळे दोन बंधाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले.