शिबिरातून शोधले ‘समाधान’

By Admin | Updated: January 7, 2015 22:55 IST2015-01-07T22:55:22+5:302015-01-07T22:55:22+5:30

विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र

The 'solution' discovered in the camp | शिबिरातून शोधले ‘समाधान’

शिबिरातून शोधले ‘समाधान’

सर्वसामान्यांना लाभ : सर्व विभागप्रमुखांनी लावली हजेरी
सडक/अर्जुनी : विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन साहित्यांचे वाटप करण्यासाठी येथे ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राजकुमार बडाले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील जि.प. सदस्य सर्वश्री रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनबाते, मिलन राऊत, पंचायत समिती सभापती निर्मला उईके, उपसभापती दामोधर नेवारे व सरपंच पंचफुला अंबादे यांची उपस्थित होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शासन सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. अशाप्रकारच्या शिबिरामधून त्यांना माहिती मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याची पाण्याची व्यवस्था, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातुन अनेक उपक्रम शिबिर फेरफार करण्यास मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. यामधून शासन निर्णयांचे वाचन, ई-निविदांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार एन.जे. उईके यांनी प्रास्ताविकातून डिसेंबर २०१४ अखेर ४५० विविध दाखल्यांचे वाटप, ८७४ फेरफार, १०३ गावात चावडी वाचन, १०३ गावात आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी पुर्ण, ३०८६ संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, ४२०३ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७७२ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७१ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, २३ इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १०२ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी, १२६५२ आम आदमी विमा योजना लाभार्थी, २७५२ आम आदमी शिष्यवृत्ती योजना लाभार्थी, ११७ आम आदमी विमा नैसर्गिक मृत्यू दावे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.संचालन ए.पी. मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार मदनलाल चुर्रे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार उपस्थित होते. शिबिराला सडक अर्जुनी परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होती. (तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: The 'solution' discovered in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.