शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

परतीच्या पावसाने धानपिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 15:29 IST

हलका धान गमाविण्याची वेळ

गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. याचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला बसत आहे. पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने हलक्या धानपिकांवर संक्रांत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ७६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण होत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करून दिवाळी सण साजरा करतात. सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी आणि मळणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून पाऊस सतत हजेरी लावत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

सोमवारी (दि. १७) सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. जळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बांध्यामध्ये पाणी साचले. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड होण्याची शक्यता आहे, तर पाऊस आणि वादळामुळे शेतातील उभे धानपीक पूर्णपणे झोपले गेले. परिणामी याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर दिवाळीपूर्वी धानाची विक्री करून सण साजरा करण्याच्या शेतकऱ्यांच्या आनंदावर पावसामुळे विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने चिंतेचे वातावरण आहे.

आठ दिवसांपूर्वी झाली होती अतिवृष्टी

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात यंदा प्रथमच तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे ५ ते ६ हजार हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, तर हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाखड धान खरेदी करणार

परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर पाखड झालेला धान खरेदी कोण करणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

रावणवाडी, खातिया, कामठा परिसराला पावसाने झाेडपले

सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रावणवाडी, कामठा, खातिया परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने नुकसान झाले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया