शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

परतीच्या पावसाने धानपिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 15:29 IST

हलका धान गमाविण्याची वेळ

गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. याचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला बसत आहे. पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्याने शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसाने हलक्या धानपिकांवर संक्रांत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ७६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण होत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करून दिवाळी सण साजरा करतात. सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी आणि मळणीचे काम सुरू आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून पाऊस सतत हजेरी लावत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

सोमवारी (दि. १७) सायंकाळच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. जळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात बांध्यामध्ये पाणी साचले. त्यामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड होण्याची शक्यता आहे, तर पाऊस आणि वादळामुळे शेतातील उभे धानपीक पूर्णपणे झोपले गेले. परिणामी याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर दिवाळीपूर्वी धानाची विक्री करून सण साजरा करण्याच्या शेतकऱ्यांच्या आनंदावर पावसामुळे विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने चिंतेचे वातावरण आहे.

आठ दिवसांपूर्वी झाली होती अतिवृष्टी

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात यंदा प्रथमच तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे ५ ते ६ हजार हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, तर हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाखड धान खरेदी करणार

परतीच्या पावसाचा फटका कापणी केलेल्या हलक्या धानाला मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर पाखड झालेला धान खरेदी कोण करणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

रावणवाडी, खातिया, कामठा परिसराला पावसाने झाेडपले

सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रावणवाडी, कामठा, खातिया परिसरात जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने नुकसान झाले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया