शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:01 PM

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे.

ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्रात जेसीबीचा वापर : नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. खोततळी तयार करण्याच्या नावावर संरक्षित वनपरिक्षेत्रातील जेसीबी लावून कटाई सर्रासपणे कटाई केली जात असल्याचा प्रकार नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सुरू आहे.दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पानवठे कोरडे पडतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची गावांकडे भटकंती सुरु होते. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी व जंगलामध्ये वन्यप्राण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याकरीता वनविभागाने यावर्षीपासून खोततळे तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. खोततळे तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.यापैकी १५ लाख रुपयांची कामे मनरेगातंर्गत तर १० लाख रुपयांची कुशल कामे केली जात आहे. सध्या नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळी तयार करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वनविभागाने खोततळी तयार करण्याची कामे कंत्रादाराने दिली आहे. मात्र कंत्राटदारकडून खोततळी तयार करण्याच्या नावावर वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. हा सर्व प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू असताना कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे टाळले जात जात आहे.नियमांचे सर्रास उल्लघंनजंगलामध्ये खोततळे तयार करताना त्या क्षेत्रात वृक्ष असल्यास केवळ १० वृक्षांची कटाई करण्याचा शासनाचा जीआर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर विभागाच्या नियमानुसार जागेची मौका चौकशी वृक्षांचा पंचनामा, वृक्षाची गोलाई, उंची मोजून कापण्याची परवानगी देऊन कटाई केलेल्या झाडाची लाकडे वन विभागाच्या आगारात जमा केली जातात. मात्र सध्या खोततळ्याच्या नावावर जेसीबी लावून वृक्षांना मुळासकट खोदून त्यांना जाळण्याचा प्रकार सुरू आहे.मागील सहा महिन्यांपासून काम सुरूनवेगावबांध वनपरिक्षेत्रात जानेवारी २०१८ पासून खोततळी तयार करण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. जिथे साधे खोदकाम करण्याची परवानगी नाही तिथे सुध्दा कंत्राटदार खोततळीचे खोदकाम जेसीबीच्या सहाय्याने सर्रासपण करीत आहेत. खोदकामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई केली जात असून या प्रकाराकडे वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.कारवाईची जबाबदारी कुणाचीसंरक्षित वनक्षेत्रात कुठलेही काम करताना त्याच्या काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लघंन होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र नवेगावबांध वनपरिक्षेत्रात खोततळीच्या नावावर सुरु असलेल्या वृक्षकटाईकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. तर काही वन अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असून देखील ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत कारवाईची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण