जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

By Admin | Updated: December 30, 2016 00:56 IST2016-12-30T00:56:31+5:302016-12-30T00:56:31+5:30

तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी,

On the shoulders of someone! | जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

काळीपिवळी वाहन चालकांची मुजोरी : अल्पवयीनांच्या हातात दुचाकी वाहन
आमगाव : तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ नवीन बाब नाही. परंतु या मार्गावर होणारी वर्दळ सुरक्षेला तडा लावत आहे. वाहतुकीची जबाबदारी असलेले विभाग माघारी फिरत असल्याने अपघातांमध्ये वाढ झालेली आहे.
राज्य सीमेवर असलेले आमगाव शहर छत्तीसगड, मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी व्यवसायाने सुविधाजनक स्थळ आहे. शहरातून राज्य मार्गावरील वाहतूक नियमित आहे. शहरातील आंबेडकर चौक, मानकर गुरुजी चौक, कामठा चौक, गांधी चौक, देवरी मार्ग, गोंदिया मार्ग यावर वाहनांची वर्दळ व नागरिकांची गर्दी असते. वाहनांना थांबा नसला तरी मर्जीप्रमाणे वाहनांची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पायदळ चालणाऱ्या व्यक्तींना अपघातांना समोर होवून मार्ग काढावा लागतो.
शहरातील आंबेडकर चौक येथे काळी-पिवळी वाहनांची वर्दळ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काळीपिवळी वाहन चालकांच्या मुजोरशाहीपुढे दुय्यम परिवहन विभाग व पोलीस विभाग हतबल ठरले आहे. या विभागाच्या आपसातील देवाण-घेवाणीपुढे मात्र नागरिकांचा जीव टांगणीला आहे. राज्य मार्गावर धावणारी अनेक काळी-पिवळी वाहने विनापरवाना, विनापार्किंगलाईट, विना लाईटने बिनधास्त राज्य मार्गावर धावत आहेत. परंतु परवाना नुतनीकरण करणारे विभाग फक्त कागदांचा पिठाऱ्यावर परवाना स्वीकारुन मुदत वाढवत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवणार कोण? असा प्रश्न पुढे आला आहे.
शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी स्थानिक पोलीस वाहतूक विभागाला पोलीस खात्यानेच नजरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस विभागातील कर्तबगार कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळवाटा काढत असल्याचे पुढे दिसत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर येऊन पडली आहे.
अनियमित वाहतूक व अस्तव्यस्त पार्किंग या समस्या शहरात आवासून उभ्या आहेत. शहराच्या मुख्य राज्यमार्गावर रस्ते सीमेलगत वाहन पार्किंगसाठी वाहतूक विभागाने सीमारेषा उतरविल्या होते. परंतु या सीमारेषांच्या आत मुख्य मार्गावर वाहनांची पार्किंग वाहतूक विभागाच्या नजरेसमोर आहे. परंतु कारवाई मात्र शून्य आहे. वाहतुकीच्या कायद्यावर बोट घालण्यासाठी पोलीस विभागाने राज्य परिवहन विभागाकडे कर्तव्य असल्याचे उघडपणे नजरा टाकल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे विभाग कोणते हा विषय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: On the shoulders of someone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.