शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

धक्दादायक ! जिल्ह्यात तब्बल ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या जिल्ह्याला हेलावून सोडणारी ही घटना असून, यानंतर आता नागरिकांनी अधिकच दक्षतेेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी २७ बाधितांची भर पडली असून, ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता कोरोना जिल्ह्यात आपले पाय घट्ट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगळवारी जिल्ह्यात २७ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १८, तिरोडा १, आमगाव २, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ५, तर इतर राज्य - जिल्ह्यातील १ रूग्ण आहे. तसेच ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव ४, सालेकसा २, देवरी २, सडक - अर्जुनी १ व इतर राज्य- जिल्ह्यातील २ रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५,९४४ एवढी झाली असून, यातील १५,९३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्के, तर व्दिगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.

आता जिल्ह्यात ८१७ रुग्ण क्रियाशील असून, यात गोंदिया तालुक्यातील ४२१, तिरोडा ७६, गोरेगाव २५, आमगाव ८०, सालेकसा १५, देवरी ५८, सडक-अर्जुनी ४१, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ८८, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १३ रूग्ण आहेत. यातील ६५५ रूग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३८७, तिरोडा ४९, गोरेगाव २१, आमगाव ५३, सालेकसा १०, देवरी ३७, सडक - अर्जुनी २५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ६३, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रूग्ण आहेत.

------------------------

आतापर्यंत १९१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०८, तिरोडा २५, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक - अर्जुनी ५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. यानंतर जिल्हयातील मृत्यू दर १.२० टक्के नोंदविण्यात आला आहे.

---------------------------

चाचण्या कमी झाल्याने बाधितांची संख्या कमी

सोमवारी होळीमुळे चाचण्या कमी प्रमाणात झाल्या. त्यामुळे बाधितांची संख्या मंगळवारी कमी दिसून आली असल्याची माहिती आहे. मात्र, आता चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढणार असून, कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. अशात नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करणे हाच एकमेव तोडगा आहे.