शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

धक्दादायक ! जिल्ह्यात तब्बल ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढ होत असतानाच मंगळवारी (दि. ३०) तब्बल ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या जिल्ह्याला हेलावून सोडणारी ही घटना असून, यानंतर आता नागरिकांनी अधिकच दक्षतेेने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी २७ बाधितांची भर पडली असून, ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, आता कोरोना जिल्ह्यात आपले पाय घट्ट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगळवारी जिल्ह्यात २७ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १८, तिरोडा १, आमगाव २, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ५, तर इतर राज्य - जिल्ह्यातील १ रूग्ण आहे. तसेच ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव ४, सालेकसा २, देवरी २, सडक - अर्जुनी १ व इतर राज्य- जिल्ह्यातील २ रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५,९४४ एवढी झाली असून, यातील १५,९३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्के, तर व्दिगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.

आता जिल्ह्यात ८१७ रुग्ण क्रियाशील असून, यात गोंदिया तालुक्यातील ४२१, तिरोडा ७६, गोरेगाव २५, आमगाव ८०, सालेकसा १५, देवरी ५८, सडक-अर्जुनी ४१, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ८८, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १३ रूग्ण आहेत. यातील ६५५ रूग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३८७, तिरोडा ४९, गोरेगाव २१, आमगाव ५३, सालेकसा १०, देवरी ३७, सडक - अर्जुनी २५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ६३, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रूग्ण आहेत.

------------------------

आतापर्यंत १९१ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०८, तिरोडा २५, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक - अर्जुनी ५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्य- जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. यानंतर जिल्हयातील मृत्यू दर १.२० टक्के नोंदविण्यात आला आहे.

---------------------------

चाचण्या कमी झाल्याने बाधितांची संख्या कमी

सोमवारी होळीमुळे चाचण्या कमी प्रमाणात झाल्या. त्यामुळे बाधितांची संख्या मंगळवारी कमी दिसून आली असल्याची माहिती आहे. मात्र, आता चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढणार असून, कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. अशात नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करणे हाच एकमेव तोडगा आहे.