शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

चार गावांसाठी तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:53 PM

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत.

ठळक मुद्देधापेवाडा प्रकल्पातील पाण्याचे बॅक स्टोरेज : कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतकाचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत. यासाठी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात सोमवारी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान दोन्ही राज्यांच्या संबंधित जिल्हाधिकाºयांशी बोलून त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.दिलीप बंसोड यांच्या नेतृत्वात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, कृष्णा भांडारकर, मुन्ना पटले, मध्यप्रदेशचे अजाब शास्त्री, उपसरपंच झनकार कडाऊ, राजेंद्र वानखेडे, दुर्योधन कोडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांची भेट घेण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी पंकज गेडाम, कनिष्ठ अभियंता एन.व्ही. अहिरराव उपस्थित होते.भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या चार गावांचे अंदाजे ९०० च्यावर शेतकरी धापेवाडा डॅमचे पाणी बॅक स्टोरेजमुळे ठप्प झाल्याने शेतात जावू शकत नाही. परिणामी एक महिन्यापासून धान कापणी करण्यात आली. पण शेतात कोणतेही साधन जात नसल्याने सर्व धान पीक शिवारात पडून आहे. शेतातील धानाची नासाडी होत असून काही दिवसांनी एक दानाही हाती लागणे कठीण आहे, असे कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांना सांगण्यात आले.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा येथील पाणी पिण्याकरिता उपयोगात यावे किंवा पिण्याच्या पाण्याची पातळी टिकून राहावी, याकरिता प्रकल्पात पाणी स्टोरेज केले जात आहे.याचा दुष्परिणामामुळे चारही गावांच्या शेतकºयांना नदी ओलांडून जाता येत नाही. नदीला लागून असलेल्या नाल्यांना थोप असल्यामुळे शेती संबंधित साधन व लोकांना जाणे कठीण झाले आहे.या वेळी माजी आ. बंसोड यांनी, धापेवाडा प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा स्टोरेज करण्यापूर्वी भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या गावांच्या ग्रामपंचायतींना सूचना देणे गरजेचे होते. असे बोलून महाराष्ट्र राज्यात पाण्याची टंचाई भागविण्याकरिता दुसºया राज्याच्या जनतेवर अन्याय करु शकत नाही. तातडीने उपाययोजना करा. दोन्ही राज्याच्या संबंधित जिल्हाधिकाºयांना विश्वासात घेवून तत्काळ व्यवस्था करायला सांगा किंवा आपण स्वत: करा, असे बजावून सांगितले.यावर कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांनी तत्काळ दोन्ही जिल्हाधिकाºयांना मिळून व्यवस्था कशी करता येईल, याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.याप्रसंगी बोलेश बिजेवार, राकेश चौरीवार, राजकुमार कावळे, महेश लिल्हारे, शंकर बारेवार, सोमा पगरवार, नारायण लिल्हारे, नान्हू लिल्हारे, गणपत ठवकर, लोकेश्वर कोडेश्वर, लिखीराम लिल्हारे, रविंद्र लिल्हारे, मोरेश्वर कोडेश्वर, रामेश्वर लिल्हारे, बालाराम राऊत, मनोज कोडेश्वर व नारायण कोडेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.नदीच्या दोन्ही तिरावर मजबूत बांधकाम करण्यात यावे. तसे झाल्यास रेताळ जमिनीमुळे किनारपट्टी वाहून जाणार नाही. तसेच कायमस्वरुपी पूल तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी आ. दिलीप बंसोड व अजाबराव शास्त्री यांनी कार्यकारी अभियंता फाळके यांच्याकडे केली.