दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांची निवड
By Admin | Updated: March 30, 2016 02:01 IST2016-03-30T02:01:21+5:302016-03-30T02:01:21+5:30
जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली.

दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांची निवड
जलयुक्त शिवार : २५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माण
गोंदिया : जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली. आता १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांची निवड करण्यात आली आहे.
दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यात गोंदिया तालुक्यातील-१०, गोरेगांव-११, तिरोडा-९, अर्जुनी/मोरगाव-९, आमगांव-९, देवरी-११, सालेकसा-८, सडक/अर्जुनी-१० अशा एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली आहे.
जलसमस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासोबत सिंचनासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणे हा या जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश आहे. चालू आर्थिक वर्षातील ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांवर २५ मार्च २०१६ पर्यंत ३२ कोटी ७२ लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांमध्ये जलस्त्रोत मजबूज करण्यासाठी कामे केली जाणार आहेत. प्रत्येक नागरिक त्या दृष्टीने जलसाक्षर होत असून जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे जाण्यासाठी आता या अभियानाला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले आहे.
विविध तलाव, नाले, साठवण बंधारे, बोडीतील २ कोटी ६४ लाख रु पयांचा १ लक्ष ११ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामातून २५ हजार ७९२ हेक्टर एवढी मोठी सुरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत सलग समतल चर, मातीनाला बांध, मजगी दुरूस्ती, गॅबियन पध्दतीचे बंधारे, शेततळी, सिमेंट नाला बांध बांधणे व दुरु स्ती करणे, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण व सरळीकरण, केटी वेअर, तलावातील गाळ काढणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वन तलाव, भात खाचरे दुरु स्ती, साठवण बंधारे, बोडी खोलीकरण/जुन्या बोडी दुरु स्ती, तलाव खोलीकरण/तलाव दुरूस्ती, माजी मालगुजारी तलाव दुरु स्ती, लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती अशी एकुण ११०५ कामे होती घेण्यात आली. त्यापैकी ९२२ कामे पूर्ण करण्यात आली. पूर्ण झालेल्या कामातून निर्माण झालेला जलसाठा १८ हजार ५४ सहस्त्र घनमीटर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दुबार पिकांसाठी लाभदायक
गाव शिवारातील पाणी गावातच साठविल्यामुळे जमीनीवरील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शाश्वत जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे कृषी उत्पादन क्षमता वाढली आहे. दुबार पिक घेण्यास या अभियानाचा महत्वाचा हातभार लागला आहे. उत्पादन क्षमतेत झालेली वाढ व दुबार पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.