शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

माध्यमिक शाळांनाही लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 22:21 IST

नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. यापासून प्राथमिक शाळा तर सोडाच मात्र माध्यमिक शाळाही (वर्ग ५-१०) सुटलेल्या नाहीत. प्राथमिक शाळाप्रमाणेच नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांतही पटसंख्या सातत्याने घट सुरू असून यंदाही तोच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेच्या पाच शाळा : विद्यार्थी पटसंख्या १७००

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार लागला आहे. यापासून प्राथमिक शाळा तर सोडाच मात्र माध्यमिक शाळाही (वर्ग ५-१०) सुटलेल्या नाहीत. प्राथमिक शाळाप्रमाणेच नगर परिषदेच्या माध्यमिक शाळांतही पटसंख्या सातत्याने घट सुरू असून यंदाही तोच प्रकार घडत असल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी गजबजणाऱ्या शाळांमध्ये आता मोजकेच विद्यार्थी दिसून येतात.प्राथमिक शाळांप्रमाणेच नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा आहेत. यात एक कन्या शाळा आहे. शिवाय एक कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा नगर परिषदेव्दारा संचालीत आहे. खाजगी शाळांमुळे नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडत असताना माध्यमिक शाळांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांची स्थिती उत्तम आहे. कारण माध्यमिक शाळांत बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी नसल्याचे दिसून येते. खाजगी शाळांमधील शिकवणीच्या तुलनेत कोठेतरी या शाळा मात्र आता कमकुवत पडत असल्याचे असल्याचे बोलल्या जाते. कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरून असणाऱ्या या शाळा आता ओसाड पडत आहेत.एकंदर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सुध्दा खाजगी शाळांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. माध्यमिक शाळांकडे बघता काहींची पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसत आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असून यामध्ये आणखीही वाढ होते काय याकडे लक्ष आहे.कनिष्ठ महाविद्यालयात ४०० विद्यार्थीनगर परिषद संचालित कनिष्ठ महाविद्यालयाची यंदाची सुरूवातीची पटसंख्या ४०० आहे. शाळांच्या तुलनेत महाविद्यालयाची यापूर्वीची स्थिती चांगली होती. मात्र यंदा ४०० विद्यार्थी पटसंख्या आर्श्चयाची व तेवढीच धक्कादायक बाब आहे. यामुळे पटसंख्या घसरण्याची लागण कनिष्ठ महाविद्यालयालाही लागल्याचे चित्र आहे.नगर परिषदेकडे माहितीचा अभावनगर परिषदेव्दारा संचालित शाळांचा किती टक्के निकाल लागला. तसेच यंदा किती विद्यार्थी आहेत याबाबत मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासनीक अधिकारी यांच्याकडे माहिती देणे अपेक्षीत आहे. मात्र दहावी व बारावीचा निकाल लागून आता महिना लोटला आहे. तसेच शाळा सुरू होऊन आता १० दिवसांपेक्षा जास्त झाले आहे. मात्र यानंतरही माध्यमिक शाळांचा निकाल व पटसंख्येबाबत माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडे माहिती नाही. यावरून नगर परिषद शाळांचा कारभार किती सुरळीत सुरू आहे हे दिसून येते.

टॅग्स :Schoolशाळा