शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे.

ठळक मुद्देशाळा सुरु करण्यास शासनाची द्विधास्थिती : संमतीपत्र देण्यास पालकांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : शाळा म्हटले की, विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असतो. मात्र शाळेत एकही विद्यार्थी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांविना शाळा असे चित्र आजपर्यंतच्या इतिहासात घडले नाही असे मत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे.दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व नवीन पुस्तके घेवून शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. त्यासोबतच इतरही वर्गांचे विद्यार्थी उत्तीर्ण होवून पुढच्या वर्गात गेले असल्याने त्यांचाही शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस अत्यंत आनंदाचा असायचा. परंतु यावर्षी परिक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असत. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असायचा, मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेतील पहिल्या दिवसाच्या आनंदावर विरजन पडले आहे.राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या शहरी भागासारखीच ग्रामीण भागातही असल्यामुळे पालकांचा आक्रोश व चिंतेमुळे शासनाला १ जुुलै पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शाळा-महाविद्यालयांना पालकांकडून संमतीपत्र घेण्यासबंधी सुचविले आहे. परंतु हमीपत्र देवून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास सक्त विरोध दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी म्हणतात की, जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करुन शाळा सुरु करावे अशी सूचना शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने परिपत्रक काढून गावातील शाळा इमारत सॅनिटाईज करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने स्विकारुन १४ व्या वित्त आयोगातील मंजूर निधी यासाठी खर्ची घालावे असे निर्देश आहेत. मात्र मुख्याध्यापक पत्र घेवून ग्रामपंचायतकडे जातात तेव्हा ग्रामपंचायत प्रशासन सॅनिटाईज करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे होईल असेही पालकांना वाटत आहे. शाळा मुख्याध्यापकांची व्यवस्था करण्यात ताराबंळ होत आहे. या परिस्थितीचा विचार करता विद्यार्थी विना शाळा ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Schoolशाळा