विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

By Admin | Updated: July 19, 2016 02:15 IST2016-07-19T02:15:27+5:302016-07-19T02:15:27+5:30

नगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत

School Adjustment Period due to the absence of students | विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

कपिल केकत ल्ल गोंदिया
नगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी या दोन शाळांत अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषद शिक्षण समितीने या दोन शाळांचे समायोजन करण्याचा ठराव घेतला आहे. समितीचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा असला तरीही नगर परिषदेसाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण ठरणार आहे.
मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार जडला आहे. कधी काळी विद्यार्थ्यांनी भरगच्च राहणाऱ्या एवढेच नव्हे तर बोर्डाचे टॉपर देणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत. परिणामी दरवर्षी झपाट्याने विद्यार्थी पटसंख्या खालावत चालली आहे. मोठ्या प्रमाणात उभ्या झालेल्या खाजगी शाळांची नजर नगर परिषदेच्या शाळांना लागली आहे. यामुळेच खाजगी शाळा जेथे विद्यार्थी सांभाळू शकत नाहीत. तेथे मात्र नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांची वाट बघावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शाळांची हीच गत आहे. यात मात्र प्राथमिक विभागातील दोन शाळा अत्यंत लाजीरवाण्या स्थितीत चालविल्या जात आहेत. यात सिव्हील लाईन्स मराठी शाळा व हिंदी टाऊन शाळा आहे. यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेत या सत्रात दोन विद्यार्थी असून हिंदी टाऊन शाळेत फक्त एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे या तीन विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेला दोन शाळा चालवाव्या लागत आहेत. अगोदरच आर्थीक स्थिती कमकुवत असलेल्या नगर परिषदेला हा मात्र जबर भुर्दडच ठरत आहे. ही स्थिती बघता नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या दोन शाळांचे अन्य शाळांत समायोजन करण्याची मागणी केली.

अस करायचेय समायोजन
४यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेला इंजिनशेड शाळेत समायोजीत करण्याचा. तसेच हिंदी टाऊन शाळेला मालवीय शाळेत समायोजीत करण्याचा निर्णय शिक्षण विषय समितीने घेतला आहे. म्हणजे सिव्हील लाईन्स शाळेतील विद्यार्थी पुढे इंजिनशेड शाळेत पाठविले जाणार. तर हिंदी टाऊन शाळेतील विद्यार्थी मालवीय शाळेत पाठविले जाणार. या दोन्ही शाळा आजच्या शाळांपासून अंतरावर असल्याने भविष्यात या दोन्ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेची शाळाच उरणार नाही. अशात आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या परिवारातील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.

Web Title: School Adjustment Period due to the absence of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.