शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गारपिटीचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती.

ठळक मुद्देकृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण : तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान, मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर सर्वाधिक नुकसान भाजीपाला पिकांचे झाल्याचे कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. सुरूवातीला रब्बी हंगामासाठी अनुकुल वातावरण असल्याने पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र सोमवारी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली.जवळपास अर्धा तास पाऊस आणि पंधरा मिनिटे गारपिट झाल्याने रस्त्यांवर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. गहू, हरभरा, वटाणा ही पिके बहरत असतानाच त्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याने ही पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. मंगळवारी सकाळीच अनेक शेतकºयांनी आपआपल्या शेताकडे धाव घेत पिकांची पाहणी केली. मात्र कालपर्यंत डोलणारे पीक पूर्णपणे भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे भरुन आले. मोठ्या मेहनतीने आणि रक्ताचे पाणी करून शेतकºयांनी रब्बीतील पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाच्या मनात काही वेगळेच असल्याने शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका १५०० हेक्टरमधील कोबी,टमाटर, वांगी, बिन्स, वटाणा या भाजीपाला पिकांना बसला.त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हाधिकाºयांकडे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात ३ हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.६० घरांची पडझडसोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील ६० घरांची पडझड झाली असून जवळपास ३ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे.२५९ मि.मी.पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.जवळपास अर्धा ते पाऊनतास पावसाने सर्वत्र हजेरी लावली असून एकूण २५९ मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.यात गोंदिया १०० मि.मी.,गोरेगाव ६.२० मि.मी., तिरोडा ६.२०,अर्जुनी २ मि.मी.,देवरी ७.४०, आमगाव ७०.५० मि.मी., सालेकसा ५३.०, सडक अर्जुनी २०.६० मि.मी.पावसाची नोंद झाली होती.केंद्रावरील धान भिजलेसोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र नेमके किती नुकसान झाले हे सांगण्यास या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळले.

टॅग्स :Rainपाऊस