शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले यांच्या अपेक्षांची पूर्तता मातृशक्तीने करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

नवेगावबांध : सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जो संदेश व जे ...

नवेगावबांध : सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जो संदेश व जे संस्कार दिले त्याला अनुसरून मातृशक्तीने संघटित व्हावे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. सावित्रीबाई फुले यांना महिलांकडून जे अपेक्षित होते, त्याची पूर्तता मातृशक्तीने करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.

येथील महिला मंडळे व बचत गट यांच्या वतीने ग्रामपंचायत परिसरात महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजया कापगते यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, माजी पंचायत समिती सदस्य शारदा नाकाडे, संजीव बडोले, बचत गटाच्या समन्वयक हेमलता गुप्ता, ग्राम संघाच्या अध्यक्षा भीमाबाई शहारे, आरोग्य पर्यवेक्षिका रेखा पुराम, दुर्गा मांढरे, मीना चांदेवार, नीलम अग्निहोत्री, शालिनी लांजेवार, आशा पांडे, कलाबाई डोंगरवार, भाग्यश्री कोसरकर, विमल कापगते, रेखा कांबळे, निर्मला डोंगरवार, हरकूबाई काशीवार, पोर्णिमा शहारे आदी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज स्त्रिया बोलू लागल्या आहेत. बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन महिलांनी खर्चाबरोबरच, बचतीची सवय स्वतःला लावून घ्यावी, असे प्रतिपादन सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले. बचत गटाचे व्यवस्थापन व महिलांचे आर्थिक उत्थान याविषयी हेमलता गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शीतल राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार लीलाबाई सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अर्चना पंधरे, दुर्गाबाई मेश्राम, लताबाई आगाशे, गुणिता डोंगरवार, सविता बडोले, हर्षा बाळबुद्धे, महिला बचत गट तसेच महिला मंडळाच्या महिलांनी सहकार्य केले.