वधू मिळविण्यासाठी वरांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:34+5:30

पुरूषप्रधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना-महिना नातेवाईकाच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

Run over to get the bride | वधू मिळविण्यासाठी वरांची धावपळ

वधू मिळविण्यासाठी वरांची धावपळ

ठळक मुद्देव्यथा शेतकरी कुटुंबांची : शासकीय नोकरदारांनाच वधुपित्याची पहिली पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. मुलाकडे शेती पाहिजे मात्र मुलगा शेतकरी नको आहे. त्यामुळे पालकवर्गाची मुली- मुलांसाठी धावपळ सुरू आहे. परिणामत: पालकांकडून विनवणी केली जात आहे की, फक्त मुलगी द्या, लग्न आम्हीच करू हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहेत.
पुरूषप्रधान समाजात उपवराचे पुर्वी पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल असायची. परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाच्या शोधासाठी मुलीचे पालक मुलगा मिळेल का म्हणून महिना-महिना नातेवाईकाच्या घरी फिरायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. खर्च आम्हीच करू म्हणून मुलाचे पालक मुलीसाठी वनवन भटकत आहेत.
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणाममुळे शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याला वाटते की, आपली मुलगी चांगल्या घरी नांदावी. सध्या ग्रामीण भागातील मुलीच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलाकडे वळली आहे. श्रीमंत असो की गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास मुलीचे पिता नकार देत आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहोच्छूक मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे. पुर्वी मुलाचे लग्न लाखो रूपयाची उधळण करून मोठ्या थाटामाटात करीत होते. मात्र आता शेतीच्या वाढत्या कर्जामुळे अल्प खर्चातच साध्या पद्धतीने लग्न केले जात आहे. मुलगी मिळणे कठीण झाल्यामुळे बऱ्याच मुलांनी हुंडा दिल्याचे समजत आहे. मुलगी दाखवून व लग्न जोडून देणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

शेतकरी नवरा नको, पण शेती हवीच
शेतकरी मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार नाहीत. सर्वात प्रथम सरकारी नोकरीवर असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जात आहे. परंतू काही ठिकाणी सध्या नोकरी सोबत शेती आहे का? असाही प्रश्न पुढे येत आहेत. शेतकरी नवरा नको पण शेती हवीच, असा प्रकार पुढे येत आहे.
मुलीच्या शोधात वाढतेय वय
परिसरातील अनेक तरूण लग्न करण्याकरिता पुढे आले असता मुलगी मिळत नसल्यामुळे त्यांचे वय ३५ ते ४० वर्ष होत आहे. काही मुलांनी तर तुम्हाला पैसे पाहिजे असतील आम्ही द्यायला तयार आहोत. लग्नाचा संपूर्ण खर्चही आम्हीच करू फक्त मुलगी द्या, असाही निर्णय घेताना दिसत आहेत.

Web Title: Run over to get the bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.