शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

शेतकऱ्यांच्या बारदान्याचे ७ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०१९-२० धानाची विक्री करणाऱ्या पूर्व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना ३६ ...

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर सन २०१९-२० धानाची विक्री करणाऱ्या पूर्व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना ३६ लाख ५१ हजार बारदान्याचे ७ कोटी २१ लाख रुपये दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही मिळालेले नाहीत. ही रक्कम परत मिळावी यासाठी शेतकरी मागील दोन वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळाच्या पायऱ्या झिजवीत आहेत.

पूर्व विदर्भात खरीप आणि रब्बी हंगामात शासकीय हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. सन २०१९-२० मध्ये पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांनी धान आणि ज्वारी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर विक्री केली. या विभागाकडे बारदाना उपलब्ध नसल्याने त्याचा खरेदीवर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना प्रतिबारदाना २० रुपये देऊन धान खरेदी करण्यात आली. बारदान्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा केली नाही. बारदान्याच्या रकमेपाेटी आदिवासी विकास महामंडळाकडे एकूण ३६ लाख ५१ हजार १६८ बारदान्याचे ७ कोटी २१ लाख रुपये थकीत असल्याची बाब रोशन बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पुढे आली आहे. सर्वाधिक बारदान्याची रक्कम गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची असून, या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे ३ कोटी ६१ लाख रुपये थकले आहेत. चंद्रपूर १ कोटी ६७ लाख, नागपूर ४३ लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १ कोटी ७७ लाख रुपये थकले आहेत. बारदान्याची रक्कम परत मिळावी यासाठी शेतकरी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. मात्र, अद्यापही रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यात आली नाही.

..............

न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी रोशन बडोले यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत या विभागाकडून माहिती मागितली. त्यानंतर या माहितीच्या आधारावर आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. सुरुवातीला या कार्यालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, बडोले यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर या विभागाने बारदान्याचे पैसे परत करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केल्याची माहिती आहे.