शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:07 IST

ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले.

ठळक मुद्देनाना पटोले : बकी-मेंडकी येथे भागवत कथा सप्ताह, सभागृहाचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमतपांढरी : ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले. त्यामुळे रामायणामध्ये ज्याप्रमाणे रामाला कोणताही त्रास हनुमानाने होऊ दिला नाही. त्याच हनुमानाच्या भूमिकेत आजचा लोकप्रतिनिधी हा आपल्या जनता जनार्दन म्हणून प्रभू श्रीरामाविषयी समर्पित असणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा त्याला हनुमानाच्या भूमिकेत राहण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी केले. ते सडक-अर्जुनी तालुक्यातील बकी (मेंडकी) येथे त्यांच्याच खासदार निधीतून तयार करण्यात आलेल्या सभा मंडपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.पटोले म्हणाले, जनतेमुळे लोकप्रतिनिधी मोठमोठे पद उपभोगतात. पण जेव्हा जनतेच्या समस्या सोडविण्याचा विषय येतो तेव्हा नेता आपल्या खुर्चीच्या मोहापायी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देतात. अशा लोकप्रतिनिधींना जनतेने येणाऱ्या काळात धडा शिकविणे तितकेच महत्वाचे असल्याचे सांगत जनतेने नेहमी जागृत राहण्याचे आवाहन केले.या वेळी हनुमान मंदिराच्या प्रांगणात संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने भंडारा जिल्हा को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जागेश्वर धनभाते, उपाध्यक्ष ईश्वर कोरे, माजी सभापती राजेश नंदागवळी, युवक काँग्रेसचे महासचिव निशांत राऊत, डॉ. बबन कांबळे, चिखलीचे सरपंच सुधाकर कुर्वे, पद्माकर नेवारे, रेशमा मोटघरे, धर्मादास शहारे, इशन शिवणकर, समितीचे अध्यक्ष ग्यानीराम मारवाडे, उपाध्यक्ष रामदास बागडे व समितीचे सदस्य उपस्थित होते. कथा व प्रवचन हभप कविता उपरीकर महाराज नागपूर यांच्या वाणीतून सादर झाली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले