शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हवेतच

By admin | Updated: January 23, 2015 01:39 IST

विमानतळासाठी बिरसी येथील नागरिकांचे घरे, जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, आजवर या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही.

विजेंद्र मेश्राम खातियाविमानतळासाठी बिरसी येथील नागरिकांचे घरे, जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, आजवर या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. पुवर्सनासाठी बांधण्यात आलेल्या ‘सॅम्पल’ घरांमध्ये राहण्यास नागरिकांनी नकार दिल्याने त्या इमारती खंडर होत आहेत. नागरिकांची घरेही जीर्ण होत चालली आहेत. दुसरीकडे विमानतळ प्राधीकरणाने गावात सुरू असलेले शाळेचे बांधकाम थांबविले असल्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून बिरसीवायी आपल्या हक्कासाठी लढा देत असून अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. विमानतळासाठी गावाची जमीन संपादित करण्यात आली. त्यानंतरही लोक आपल्या जुन्या घरांमध्ये राहत आहे. जीर्ण होत चाललेल्या घरांची दुरुस्ती करायची की नाही, असा प्रश्न या नागरिकांसमोर आहे. या गावात शाळेसाठी एक नवी इमारत बांधण्यात येणार होती. इमारतीचे कामही सुरू झाले. मात्र, विमानतळ प्राधीकरणाने या बांधकामावर बंदी घातली. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबविण्यात आले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. बिरसी विमानतळाच्या वतीने बिरसी ग्रामवासीसाठी काही सॅम्पल म्हणून घरे ही बनविण्यात आले होते. पण ते घरे ही आता धूळखात आहेत. कारण गावकऱ्यांनी त्या प्रकारच्या बनले असलेल्या घरामध्ये आपले राहणे अशक्य दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांनी तेथे राहण्यास स्पष्ट नकार दिला. गेल्या पाच वर्षामध्ये २००९ मध्ये गावकऱ्यांनी शेतकरी संघटने्यावतीने न्याय मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. २०१० मध्ये जानेवारी महिन्यात उपोषण करण्यात आले. आॅक्टोबर २०१० मध्ये एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले. २०१२ मध्ये मे महिन्यात पाच दिवसाचा साखळी उपोषण करण्यात आले. नंतर पुन्हा २०१३ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात १४ दिवसांचे साखळी उपोषण केला. सर्वात मोठा ५५ दिवसांचा साखळी उपोषण १६ डिसंबर २०१३ ते ८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत करणत आले. यामध्ये अर्धनग्न भीक मांगो आंदोलन व बिरसी विमानतळासमोर धरणा आंदोलन करण्यात आले. वेळोवेळी झालेल्या आंदोलन व उपोषणमध्ये बिरसीच्या नागरिकांनी पुनर्वसनासहअन्य प्रश्न सोडविण्याची मागणी केली. अधिकारी येतात, आश्वासने देतात. पण पुढे काहीच होत नाही. शासनाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी सरपंच रविंद तावाडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष गजेंद्र वंजारी, सचिव गोविंद खडेले आदींनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.