शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हवेतच

By admin | Updated: January 23, 2015 01:39 IST

विमानतळासाठी बिरसी येथील नागरिकांचे घरे, जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, आजवर या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही.

विजेंद्र मेश्राम खातियाविमानतळासाठी बिरसी येथील नागरिकांचे घरे, जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, आजवर या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. पुवर्सनासाठी बांधण्यात आलेल्या ‘सॅम्पल’ घरांमध्ये राहण्यास नागरिकांनी नकार दिल्याने त्या इमारती खंडर होत आहेत. नागरिकांची घरेही जीर्ण होत चालली आहेत. दुसरीकडे विमानतळ प्राधीकरणाने गावात सुरू असलेले शाळेचे बांधकाम थांबविले असल्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून बिरसीवायी आपल्या हक्कासाठी लढा देत असून अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. विमानतळासाठी गावाची जमीन संपादित करण्यात आली. त्यानंतरही लोक आपल्या जुन्या घरांमध्ये राहत आहे. जीर्ण होत चाललेल्या घरांची दुरुस्ती करायची की नाही, असा प्रश्न या नागरिकांसमोर आहे. या गावात शाळेसाठी एक नवी इमारत बांधण्यात येणार होती. इमारतीचे कामही सुरू झाले. मात्र, विमानतळ प्राधीकरणाने या बांधकामावर बंदी घातली. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबविण्यात आले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. बिरसी विमानतळाच्या वतीने बिरसी ग्रामवासीसाठी काही सॅम्पल म्हणून घरे ही बनविण्यात आले होते. पण ते घरे ही आता धूळखात आहेत. कारण गावकऱ्यांनी त्या प्रकारच्या बनले असलेल्या घरामध्ये आपले राहणे अशक्य दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांनी तेथे राहण्यास स्पष्ट नकार दिला. गेल्या पाच वर्षामध्ये २००९ मध्ये गावकऱ्यांनी शेतकरी संघटने्यावतीने न्याय मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले. २०१० मध्ये जानेवारी महिन्यात उपोषण करण्यात आले. आॅक्टोबर २०१० मध्ये एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले. २०१२ मध्ये मे महिन्यात पाच दिवसाचा साखळी उपोषण करण्यात आले. नंतर पुन्हा २०१३ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात १४ दिवसांचे साखळी उपोषण केला. सर्वात मोठा ५५ दिवसांचा साखळी उपोषण १६ डिसंबर २०१३ ते ८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत करणत आले. यामध्ये अर्धनग्न भीक मांगो आंदोलन व बिरसी विमानतळासमोर धरणा आंदोलन करण्यात आले. वेळोवेळी झालेल्या आंदोलन व उपोषणमध्ये बिरसीच्या नागरिकांनी पुनर्वसनासहअन्य प्रश्न सोडविण्याची मागणी केली. अधिकारी येतात, आश्वासने देतात. पण पुढे काहीच होत नाही. शासनाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी सरपंच रविंद तावाडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष गजेंद्र वंजारी, सचिव गोविंद खडेले आदींनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.